शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:38 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे.

ठळक मुद्दे‘आस्था’चा उपक्रम : शिलाई मशीनसह गाय व शेळ्या वितरित

आॅनलाईन लोकमतवर्धा : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. घरातील कर्त्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा असतो. अशा नाजूक परिस्थितीत सदर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिलासा देण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आस्था चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबियांना गाय, शिलाई मशीन व शेळ्या वितरित करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आशीष गुलवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, डॉ. नितीन जसवंते, बंडू कडू, विलास माहूरे, अ‍ॅड. भाऊसाहेब भांबुरकर, सविता पुरी, गणेश आजणे, आशीष पांडे, प्रवीण वैद्य, जानवी सोळंकी, सोनाली लांडे, भाग्यश्री ईखार, नरेश वडणारे, मोहसीन शेख, पिंटू छांगाणी, प्रवीण देशमुख, सुमीत बिजवे, निलेश एकोनकार, प्रमोद बिजवे, विजय कदम, रंजीत कदम, श्याम कदम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान धनोडी (ना.) येथील अशोक देढे यांच्या कुटुंबियांना गाय, मांडला येथील अरुण चरपे, चिंचोली येथील उत्तम सयाम, आष्टी तालुक्यातील देविदास ठाकरे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन शेळ्या वितरित करण्यात आल्या. तर वाढोणा येथील शेतकरी वैभव इंगळे यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीन देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा येलचटवार यांनी केले. कार्यक्रमात आस्थाच्या विदर्भ समन्वयक पदी बंडू कडू तर अमरावती जिल्हा समन्वयक पदी विलास माहूरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला कैलास ईखार, चिंदुजी झामरे, चंद्रशेखर नेहारे, सुरेश खवशी, नितीन सहारे, डॉ. राऊत, मंगेश टाक, समीर जगताप, धीरज लाडके, शुभम राऊत, प्रज्वल लांडे, शामल देशमुख, योगेश बांडे, मनोज मनवर, नीरज जयस्वाल, इंद्रदास बेनोटे, दिनेश हरले आदींची उपस्थिती होती.सामाजिक बांधिलकी जोपासत वाटचालमागील टप्प्यात सदर संस्थेच्या पुढाकाराने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. इतकेच नव्हे तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दहा हजार रुपये आणि आष्टी येथील अनाथ भावंडांना शिवसेना व आस्थातर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदत देण्यात आली होती.