शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:38 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे.

ठळक मुद्दे‘आस्था’चा उपक्रम : शिलाई मशीनसह गाय व शेळ्या वितरित

आॅनलाईन लोकमतवर्धा : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. घरातील कर्त्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा असतो. अशा नाजूक परिस्थितीत सदर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिलासा देण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आस्था चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबियांना गाय, शिलाई मशीन व शेळ्या वितरित करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आशीष गुलवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, डॉ. नितीन जसवंते, बंडू कडू, विलास माहूरे, अ‍ॅड. भाऊसाहेब भांबुरकर, सविता पुरी, गणेश आजणे, आशीष पांडे, प्रवीण वैद्य, जानवी सोळंकी, सोनाली लांडे, भाग्यश्री ईखार, नरेश वडणारे, मोहसीन शेख, पिंटू छांगाणी, प्रवीण देशमुख, सुमीत बिजवे, निलेश एकोनकार, प्रमोद बिजवे, विजय कदम, रंजीत कदम, श्याम कदम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान धनोडी (ना.) येथील अशोक देढे यांच्या कुटुंबियांना गाय, मांडला येथील अरुण चरपे, चिंचोली येथील उत्तम सयाम, आष्टी तालुक्यातील देविदास ठाकरे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन शेळ्या वितरित करण्यात आल्या. तर वाढोणा येथील शेतकरी वैभव इंगळे यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीन देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा येलचटवार यांनी केले. कार्यक्रमात आस्थाच्या विदर्भ समन्वयक पदी बंडू कडू तर अमरावती जिल्हा समन्वयक पदी विलास माहूरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला कैलास ईखार, चिंदुजी झामरे, चंद्रशेखर नेहारे, सुरेश खवशी, नितीन सहारे, डॉ. राऊत, मंगेश टाक, समीर जगताप, धीरज लाडके, शुभम राऊत, प्रज्वल लांडे, शामल देशमुख, योगेश बांडे, मनोज मनवर, नीरज जयस्वाल, इंद्रदास बेनोटे, दिनेश हरले आदींची उपस्थिती होती.सामाजिक बांधिलकी जोपासत वाटचालमागील टप्प्यात सदर संस्थेच्या पुढाकाराने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. इतकेच नव्हे तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दहा हजार रुपये आणि आष्टी येथील अनाथ भावंडांना शिवसेना व आस्थातर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदत देण्यात आली होती.