शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मदत व नोकरीने आंदोलक शांत

By admin | Updated: February 4, 2015 23:18 IST

पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यातच अतिक्रमणग्रस्त महिला रिता थॉमस हिने आत्महत्या केल्याने

अतिक्रमणाविरूद्धचा संताप : दुसऱ्या दिवशीही पुलगाव बंद; संतप्त व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यावर धावपुलगाव : पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यातच अतिक्रमणग्रस्त महिला रिता थॉमस हिने आत्महत्या केल्याने वातावरण आणखीच तापले़ बुधवारी (दि़४) शवविच्छेदनानंतर रिताचा मृतदेह पालिकेच्या आवारात ठेवत बसपाद्वारे आंदोलन करण्यात आले़ अखेर दुपारी ३ वाजतानंतर प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात मृतकाच्या मुलास नोकरी व आर्थिक मदत, असा सामंजस्यपूर्ण समेट घडून आल्याने वातावरण काहीसे निवळले. सतत सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आणि दोन दिवसांपासून सामाजिक दबावामुळे ठप्प झालेले बाजारपेठेतील व्यवहार यामुळे शेकडो आंदोलनकर्ते आणि व्यापाऱ्यांनी बुधवारी ११ वाजता मोर्चा काढत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती पाहता बुधवारीही बाजारपेठा बंद होत्या. परिस्थिती लक्षात घेत पोलीस प्रशासनाने पुन्हा अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविली. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर हे देखील दाखल झाले होते. प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात बराच काळ चर्चा झाल्यानंतर मृतकाच्या मुलास नगर पालिकेच्या आस्थापनेत घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे पाठविण्याचा, त्यांनी मान्यता दिल्यानंतर नोकरी देण्याचा व मृतक महिलेच्या कुटूंबीयास २५ हजार देण्याचा निर्णय उभय पक्षात घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मनीष साहू यांनी ‘लोकमत’ला दिली. समेट झाल्यानंतर रिता थॉमस हिचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेवून अंत्यसंस्कारासाठी नेले. आंदोलनात बसपा जिल्हाध्यक्ष उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजु लोहकरे, हेमलता शंभरकर यांनी तर शोकसभेत चंद्रकात वाघमारे, गौतम गजभिये, अरूण रामटेके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चर्चेत उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली, नगराध्यक्ष मनीष साहू, बसपाचे उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजू लोहकरे, कॉँग्रेस शहराध्यक्ष रमेश सावरकर, सुभाष लुकड, मौला शरीफ ही मंडळी सहभागी झाली होती.(तालुका प्रतिनिधी)