शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या

By admin | Updated: November 22, 2014 23:06 IST

विदर्भातील शेतीची यंदाची स्थिती बिकट झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ती सोडवण्याकरिता शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत

मुख्यमंत्र्यांना निवेदन : किसान अधिकार अभियानची मागणी वर्धा : विदर्भातील शेतीची यंदाची स्थिती बिकट झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ती सोडवण्याकरिता शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना सोपविले आहे. जिल्ह्यात खरीपाच्या सुरुवातीलाच पावसाच्या विलंबामुळे दुबार-तिबार पेरणीने आधिच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनची नापिकी, कपाशीवरील लाल्या व बाजारात कापूस सोयाबीनला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. वर्तमान शासनाने निवडणुकांच्या काळात केलेल्या घोषणांप्रमाणे ५० टक्के नफा धरून शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव जाहीर करावे. डॉ. स्वामीनाथन व डॉ. नरेंद्र जाधव समितीने दिलेल्या सुचनांचा तत्काळ अवलंब करावा. शेतकऱ्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्याची सवलत द्यावी व हेक्टरी २५ हजार रुपये दुष्काळ प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना शिवाय पैसेवारी ५० च्या आत आलेल्या तालुक्यातील गावांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)