शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 2, 2015 01:42 IST

सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे.

पिकांचे नुकसान : वन विभागाचे दुर्लक्षवर्धा : सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे. यातच वन्यप्राण्यांनीही शेतात धुडगूस घालण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना रानडुक्कर, रोही यांच्या बंदोबस्तासाठी शस्त्र परवाना देण्यास मंजुरी दिली; पण कामे सोडून तेच करायचे काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत़ वन्यप्राणी शेतात धुडगूस घालत असून पिकांचे नुकसान करीत आहे़ शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांना मारताही येत नाही आणि वन विभाग त्यांचा बंदोबस्तही करीत नाही़ शिवाय वन्य प्राण्यांना मारू नका, असा फतवा वन विभाग काढत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसास वन विभागाचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेत शिवारात रानडुक्कर, रोही, माकड व इतर वन्यप्राणी कपाशी, तूर, ऊस व अन्य पिकांचे नुकसान करीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार शेतकरी करतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना शस्त्र परवाना देण्याची बाब वन विभागाने मान्य केली; पण शेतकरी शेतातील कामे सोडून शस्त्र घेऊन प्राण्यांना मारण्याचे काम करणार काय, हाही प्रश्नच आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)