शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 2, 2015 01:42 IST

सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे.

पिकांचे नुकसान : वन विभागाचे दुर्लक्षवर्धा : सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे. यातच वन्यप्राण्यांनीही शेतात धुडगूस घालण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना रानडुक्कर, रोही यांच्या बंदोबस्तासाठी शस्त्र परवाना देण्यास मंजुरी दिली; पण कामे सोडून तेच करायचे काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत़ वन्यप्राणी शेतात धुडगूस घालत असून पिकांचे नुकसान करीत आहे़ शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांना मारताही येत नाही आणि वन विभाग त्यांचा बंदोबस्तही करीत नाही़ शिवाय वन्य प्राण्यांना मारू नका, असा फतवा वन विभाग काढत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसास वन विभागाचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेत शिवारात रानडुक्कर, रोही, माकड व इतर वन्यप्राणी कपाशी, तूर, ऊस व अन्य पिकांचे नुकसान करीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार शेतकरी करतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना शस्त्र परवाना देण्याची बाब वन विभागाने मान्य केली; पण शेतकरी शेतातील कामे सोडून शस्त्र घेऊन प्राण्यांना मारण्याचे काम करणार काय, हाही प्रश्नच आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)