शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 2, 2015 01:42 IST

सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे.

पिकांचे नुकसान : वन विभागाचे दुर्लक्षवर्धा : सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे. यातच वन्यप्राण्यांनीही शेतात धुडगूस घालण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना रानडुक्कर, रोही यांच्या बंदोबस्तासाठी शस्त्र परवाना देण्यास मंजुरी दिली; पण कामे सोडून तेच करायचे काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत़ वन्यप्राणी शेतात धुडगूस घालत असून पिकांचे नुकसान करीत आहे़ शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांना मारताही येत नाही आणि वन विभाग त्यांचा बंदोबस्तही करीत नाही़ शिवाय वन्य प्राण्यांना मारू नका, असा फतवा वन विभाग काढत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसास वन विभागाचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेत शिवारात रानडुक्कर, रोही, माकड व इतर वन्यप्राणी कपाशी, तूर, ऊस व अन्य पिकांचे नुकसान करीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार शेतकरी करतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना शस्त्र परवाना देण्याची बाब वन विभागाने मान्य केली; पण शेतकरी शेतातील कामे सोडून शस्त्र घेऊन प्राण्यांना मारण्याचे काम करणार काय, हाही प्रश्नच आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)