शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

थकीत कर्जामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: May 21, 2015 02:06 IST

मागील खरीप हंगामात अतिवृष्टी व विलंबाने आलेला पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

पिंपळखुटा : मागील खरीप हंगामात अतिवृष्टी व विलंबाने आलेला पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी भीषण दुष्काळाच्या संकटात सापडला. शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडता आले नाही. आता पुन्हा खरीप हंगाम तोंडावर असल्याने कर्ज वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे दिसते.विलंबाने आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. शिवाय अवेळी आलेल्या पावसाने प्रत गेली व बाजारभाव कमी झाला. तुरीचे पीकही कमी पावसामुळे अधिक उत्पन्न देऊ शकले नाही. कापसाच्या पिकावर जंगली श्वापदांसह विविध रोगांचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात दुष्काळाची निराशाच पडली. शेतीकरिता बँकेकडून कर्ज घेतले; पण ते अदा करता आले नाही. यामुळे डोईवर कर्जाचा डोंगर उभा झाला. नवीन कर्ज कसे मिळणार, पुढील वर्षाची पेरणी कशी करावी, प्रपंच कसा करावा, मुला-मुलींचे शिक्षण, लग्नप्रसंग, आजारपण आदी जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. शेतीला अधिक खर्च आला आणि उत्पादन अत्यल्प झाले. कापूसही मातीमोल भावाने विकावा लागला. अतिवृष्टी व दुष्काळापोटी शासनाने मदत दिली; पण ती अत्यल्पच होती. यामुळे या खरीपासाठी खते, कीटकनाशके, बियाणे कसे खरेदी करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल शेतकरी येत्या हंगामातही शेतीसाठी उभा राहणार असून कामे सुरू झाली आहेत.(वार्ताहर)