शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:32 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री

रात्रभर मुसळधार : सात गावांचा संपर्क तुटला, तीन रस्ते बंद लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री कोसळलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले. रात्रभर आलेल्या पावसामुळे चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला होता. सोनेगावचा रस्ता वाहून गेला तर अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा ठप्प झाला होता. मंगळवारी रात्री जिल्ह्यात ५०१.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यात चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात १०५.२० मिमी झाला. समुद्रपूर तालुक्यात ९८ मिमी, देवळी ७२ मिमी तर वर्धा तालुक्यात ६५.८० मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय सेलू तालुक्यात ६२ मिमी, आर्वी ३६ मिमी, आष्टी (श.) ३३.२० मिमी तर कारंजा तालुक्यात २९.६० मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला. या पुरामुळे वायगाव-राळेगाव मुख्य मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे सरूळ, चना (टाकळी), सोनेगाव (बाई), आलोडा, बोरगाव, निमसडा, पात्री, ममदापूर या गावांसह अन्य गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरून पाणी असल्याने राळेगाव-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नदीला लागून असलेल्या नाल्याच्या पाण्यामुळे चना (टाकळी) येथील पूल वाहून गेला. यामुळे ग्रामस्थांना गावातच अडकून पडावे लागले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण प्रारंभी पावसाने हुलकावणी दिली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना मोड आल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यानंतर बऱ्यापैकी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची पिके बचावली. जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नव्हता. मंगळवारी रात्री मात्र जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाचे आगमन झाले. रात्री ११ वाजतापासून सकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. परिणामी, जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.