शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

‘समृद्धी’ने दुभंगलेली मने अजूनही जुळलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले.

प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ‘पैसा आणि संपत्ती’ हे रक्ताच्या नात्यालाच नाही तर जन्मदात्यांनाही विसरायला भाग पाडतात. अशी परिस्थिती नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने निर्माण केली आहे. या महामार्गामुळे सेलू तालुक्यातील बहीण-भावांच्या पवित्र नात्यातही अंतर निर्माण झाले आहे. आता महामार्ग पूर्ण झाला खरा; पण ही दुभंगलेली मने अद्यापही जुळली नाही. या भाऊबीजेच्या सणाला भाऊ-बहिणींमधील रुसवे फुगवे कायम असल्याने नात्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले. समृद्धी महामार्गाचा मोबदला उचलताना विवाहित बहिणी आडव्या आल्यात. त्यांनी हिस्सा-वाटणीची मागणी केल्याने नात्यांमध्ये वितुष्ट आले. जमिनीचा कोट्यवधीचा मोबदला बघून अनेकांनी ‘मी ही वारसदार’ असा कांगावा सुरू केला. समृद्धी महामार्ग विभागाने शेतीचे विक्रीपत्र करून घेतले त्यावेळी काही बहिणींनी त्यास विरोध केला. त्यामुळे कायदेशीर भावांनाच मोबदला देणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे चारभिंतीच्या आतील वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आणि बहीण-भावाचे नाते कायमचे दूर झाले. यातुनच दरवर्षी दिवाळीनिमित्ताने भाऊबिजेला माहेरी, भावाकडे येणारी बहीण गेल्या दोन वर्षांपासून फिरकलीच नाही. यावर्षीही तीच परिस्थिती असल्याने ‘या महामार्गामुळे दोन शहरांमधील अंतर कमी करून शेतकऱ्यांना समृद्ध केले; परंतु रक्तांच्या नात्यांमध्ये कायमचे अंतर वाढवून घराघरात वाद निर्माण केले’ असे मत आता व्यक्त व्हायला लागले आहे.

तिसऱ्यावर्षीही अंतर कायमपैशामुळे बहिणीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या भावाच्या मनातील बहिणीबद्दलचा आदर संपला. काही बहिणींनी पैशाला नाकारून बहीण-भावाच्या नात्याला महत्त्व दिल्याने भावांनीही स्वमर्जीने बहिणींना ओवाळणी म्हणून मोठी रक्कम दिली. मात्र, काहींचे संबंध ताणल्या गेले ते कायमचेच. सलग तिसऱ्या वर्षीही नात्यातील अंतर कायमच असल्याने हा महामार्ग नात्यात वैरी ठरला आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग