शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा हीच खरी देश आणि समाजसेवा होय

By admin | Updated: February 10, 2016 02:47 IST

आरोग्य सेवा हिच खरी देशसेवा आणि समाजसेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून समाजाचे कल्याण होते.

अंकित गोयल : महाआरोग्य अभियानांतर्गत रक्तदान, अपंग तपासणी, आयुष निदान व उपचार शिबिरांना सुरूवातवर्धा : आरोग्य सेवा हिच खरी देशसेवा आणि समाजसेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून समाजाचे कल्याण होते. समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने नि:स्वार्थ भावनेने शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचेल याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.जिल्हा सामान्य रुग्णालयात महाआरोग्य अभियानांतर्गत आयुष निदान व उपचार, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व अपंग तपासणी शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयासचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनूपम हिवलेकर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. घेवडे उपस्थित होते.आरोग्य व पोलीस सेवा एकमेकांना पूरक कार्य करीत असते. या सेवेतून समाजाचे कल्याण होते. आरोग्य सेवा ही देशसेवा आहे. या सेवेचे व्रत ज्यांनी अंगिकारले, त्याचे नेहमीच कौतुक वाटते. त्यांच्या या व्रतामुळे तळागाळातील व्यक्तींपासून सर्वांचेच कल्याण होते. आयुष्य वाचते. प्रत्येकाला जीवनदान देण्याचे कार्य आरोग्य सेवेतून होते, असेही गोयल यांनी सांगितले. डॉ. मडावी यांनी १ फेब्रुवारीपासून महाआरोग्य अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रक्तदान, अपंग तपासणी, आयुष निदान व उपचार तथा राजीव गांधी योजनेंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाआरोग्य शिबिरांतून गावापासून शहरातील विविध आरोग्य केंद्र, रुग्णालयात आरोग्य सेवांचा लाभ देण्यात येत आहे. या शिबिरांचा प्रत्येक गरजूने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. चव्हाण यांनी १३ मार्चपर्यंत चालणाऱ्या महाआरोग्य अभियान शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. घेवडे यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेला देण्यात येतो. जिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असून येथे कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. आयुष विभागाच्या डॉ. अश्विनी डोने यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आयुष विभागात पारंपरिक चिकित्सा पद्धतीबाबत माहिती दिली. यात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग व निसर्गोपचार, पंचकर्म व बिलतदबीर अंतर्गत रोगनिदान व उपचार याबाबत माहिती देऊन या चिकित्सक पद्धतीचा उपयोग रुग्णांनी करावा, असे सांगितले. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत विविध रुग्णांना या योजनेचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील चार रुग्णालयांत या योजनेचा लाभ देण्यात येत असून ही योजना पेपर व कॅशलेस असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेसाठी उपयोगी आहे. ९७१ आजारांवर या योजनेंतर्गत उपचार करून रोगाचे निदान नि:शुक्ल केले जात असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संचालन मॅसन यांनी केले तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया यांनी मानले. यानंतर मान्यवरांनी आयुष निदान व उपचार विभागाला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. कार्यक्रमास सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, मेट्रन पुनसे, डॉ. आकरे, डॉ. रहाटे, जि.प. आरोग्यचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)