शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

९२ हजार व्यक्तींशी संवाद साधून आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे. १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ६०३ पथकामार्फत २५ हजार ४१५ गृहभेटी देऊन ९२ हजार ६९० व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम : ६०३ विशेष पथकांकडून २५ हजार ४१५ गृहभेटी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासह त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी कशा प्रकारे घ्यावी, हे पटवून देण्यासाठी राज्य शासनाने १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ हे जनजागृती अभियान दोन टप्प्यात राबविण्याचे निश्चित केले आहे. याच विशेष मोहिमेच्या माध्यमातून २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९२ हजार व्यक्तींशी संवाद साधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे. १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ६०३ पथकामार्फत २५ हजार ४१५ गृहभेटी देऊन ९२ हजार ६९० व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान १२४ व्यक्तींना सर्दी, तापची लक्षणे आढल्याचे निष्पन्न झाले. तसेच ऑक्सिजनची पातळी ९५ टक्केच्या कमी असलेली २५ व्यक्ती आढळून आली. या व्यक्तींना रुग्णालयात उपचार घेण्यास कळविण्यात आले आहे. गृहभेटी दरम्यान भेट दिलेल्या घरांना स्टिकर लावण्यात येत आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तींना वेळीच आरोग्य तपासणी करण्यासह कोरोना काळात कसे रहावे याची माहिती दिली जात आहे. प्रत्येक व्यक्तीची तापमानाची नोंद करण्यात येत आहे. घरातील सदस्यांना कर्करोग, अस्थमा, मधूमेह, किडनी यासारखे अतिजोखमीचे आजार असल्यास त्याची नोंद घेण्यात येत आहे. तसेच मास्क लावणे, वारंवार साबनाने हाथ धुणे, नाक, तोंड व डोळे यांना वारंवार हात लावू नये, गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे इत्यादी माहिती दिली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या