शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

६० शिबिरातून दोन लाख नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:19 IST

जिल्हा परिषद, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री आरोग्य मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.

सुधीर दिवे यांची पत्रकार परिषदेत माहिती : वर्धेत २२ पासून मुख्यमंत्री आरोग्य मॅराथॉन लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री आरोग्य मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. येत्या २२ जुलै पासून या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. यात राबविण्यात येत असलेल्या ६० शिबिरातून सुमारे दोन लाख नारिकांच्या आरोग्याची तपासणीचा मानस आरोग्य मॅराथॉनचे मुख्य आयोजक सुधीर दिवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी आरोग्य मॅराथॉनचे मुख्य संरक्षक खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, पशु व कृषी विभागाचे सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री मॅराथॉनदरम्यान आरोग्य तपासणी शिबिरात दुर्धर आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर राजीव गांधी जीवनदायी योजना, मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात येणार आहे. ही आरोग्य मॅराथॉन सणांचे दिवस वगळता एकूण ६३ दिवस चालणार आहे. अंतिम शिबिर २४ सपटेंबर रोजी वर्धेत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उपस्थित राहतील अशी माहिती दिवे यांनी दिली. आरोग्य तपासणीकरिता सावंगी मेघे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यासह सारथी बहुउद्दशिय संस्था, मातोश्री आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई येथील तज्ज्ञांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती आहे. शिवाय या आरोग्य शिबिरात कॅन्सरची विशेष तपासणी होणार आहे. याकरिता २० दिवस मुंबई येथील कॅन्सर तज्ज्ञ वर्धेत दाखल होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रात होत असलेल्या शिबिराचे उद्घाटन २२ जुलै रोजी हिंगणघाट-समुद्रपूर येथील कांढळीत होणार आहे. या शिबिरात नागरिकांच्या सहभागाकरिता बसगाड्यांची व्यवस्था आहे. मॅराथॉनच्या आयोजनाची माहिती मुख्य आयोजक अविनाश देव यांनी दिली. त्यांनी आरोग्य मॅराथॉनकरिता जिल्हाभर फिरून १,३०८ गट तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी आमदार दादाराव केचे, सुनील गफाट यांच्यासह भाजपाचे पदधिकारी उपस्थित होते.