शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

मुख्यालयी निवासास कर्मचाऱ्यांची बगल

By admin | Updated: September 21, 2014 23:56 IST

महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना

गिरड : महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे़ या प्रकारामुळे गावातील विजेच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे़महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी का राहत नाहीत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़ सध्या पावसाळा असल्याने गावातील विजेच्या समस्यांचा प्राधान्याने निपटारा करणे अनिवार्य आहे़ यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे असते; पण येथील कर्मचारी मुख्यालयी उपस्थित नसतात़ यामुळे तक्रारी कुणाकडे कराव्यात, असा प्रश्न सामान्यांना भेडसावतो़रोहीत्रावरून वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागते़ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाची वीज नेहमीच एक फेज गायब असल्याने बंद असते; पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरूस्ती करण्यास वेळ नसल्याचे दिसते़ लाईनमनला फोन केला तर उत्तर मिळत नाही. कार्यालयात गेल्यास अधिकारीही मिळत नाहीत़ मग, दाद कुणाकडे मागावी, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़वीज दुरूस्तीची सर्व साधने कर्मचाऱ्यांना देण्यात आली असली तरी आता होणार नाही, असे सांगितले जाते़ पावसाळ्यात विजेचा हमखास त्रास सहन करावा लागतो़ संततधार पाऊस असला तर पाऊस थांबेपर्यंत अंधारात राहावे लागते. महावितरणचे कर्मचारी नागरिकांना असभ्य वागणूक देतात व उडवाउडवीची उत्तरे देतात. गावातील नागरिक वा शेतकरी यांनी तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो़ शेतकरी, ग्राहकांना वीज त्वरित दुरूस्त करून घ्यायची असल्यास तालुका अभियंता वा उपअभियंत्यांशी संपर्क करावा लागतो़ यानंतरच ग्राहकांना न्याय मिळतो़ अन्यथा खासगी लाईनमन शोधून दुरुस्ती करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो़ रात्रीला महावितरणचा लाईनमन गावात राहावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते़ या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या समस्यांत वाढ होत आहे़ खंडित झालेली वीज रात्रभर येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत गिरड ३३ केव्ही अंतर्गत कनिष्ठ अभियंता व सर्व लाईनमनला मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)