शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी निवासास कर्मचाऱ्यांची बगल

By admin | Updated: September 21, 2014 23:56 IST

महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना

गिरड : महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे़ या प्रकारामुळे गावातील विजेच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे़महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी का राहत नाहीत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़ सध्या पावसाळा असल्याने गावातील विजेच्या समस्यांचा प्राधान्याने निपटारा करणे अनिवार्य आहे़ यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे असते; पण येथील कर्मचारी मुख्यालयी उपस्थित नसतात़ यामुळे तक्रारी कुणाकडे कराव्यात, असा प्रश्न सामान्यांना भेडसावतो़रोहीत्रावरून वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागते़ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाची वीज नेहमीच एक फेज गायब असल्याने बंद असते; पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरूस्ती करण्यास वेळ नसल्याचे दिसते़ लाईनमनला फोन केला तर उत्तर मिळत नाही. कार्यालयात गेल्यास अधिकारीही मिळत नाहीत़ मग, दाद कुणाकडे मागावी, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़वीज दुरूस्तीची सर्व साधने कर्मचाऱ्यांना देण्यात आली असली तरी आता होणार नाही, असे सांगितले जाते़ पावसाळ्यात विजेचा हमखास त्रास सहन करावा लागतो़ संततधार पाऊस असला तर पाऊस थांबेपर्यंत अंधारात राहावे लागते. महावितरणचे कर्मचारी नागरिकांना असभ्य वागणूक देतात व उडवाउडवीची उत्तरे देतात. गावातील नागरिक वा शेतकरी यांनी तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो़ शेतकरी, ग्राहकांना वीज त्वरित दुरूस्त करून घ्यायची असल्यास तालुका अभियंता वा उपअभियंत्यांशी संपर्क करावा लागतो़ यानंतरच ग्राहकांना न्याय मिळतो़ अन्यथा खासगी लाईनमन शोधून दुरुस्ती करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो़ रात्रीला महावितरणचा लाईनमन गावात राहावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते़ या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या समस्यांत वाढ होत आहे़ खंडित झालेली वीज रात्रभर येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत गिरड ३३ केव्ही अंतर्गत कनिष्ठ अभियंता व सर्व लाईनमनला मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)