शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

मुख्यालयी निवासास कर्मचाऱ्यांची बगल

By admin | Updated: September 21, 2014 23:56 IST

महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना

गिरड : महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे़ या प्रकारामुळे गावातील विजेच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे़महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी का राहत नाहीत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़ सध्या पावसाळा असल्याने गावातील विजेच्या समस्यांचा प्राधान्याने निपटारा करणे अनिवार्य आहे़ यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे असते; पण येथील कर्मचारी मुख्यालयी उपस्थित नसतात़ यामुळे तक्रारी कुणाकडे कराव्यात, असा प्रश्न सामान्यांना भेडसावतो़रोहीत्रावरून वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागते़ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाची वीज नेहमीच एक फेज गायब असल्याने बंद असते; पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरूस्ती करण्यास वेळ नसल्याचे दिसते़ लाईनमनला फोन केला तर उत्तर मिळत नाही. कार्यालयात गेल्यास अधिकारीही मिळत नाहीत़ मग, दाद कुणाकडे मागावी, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़वीज दुरूस्तीची सर्व साधने कर्मचाऱ्यांना देण्यात आली असली तरी आता होणार नाही, असे सांगितले जाते़ पावसाळ्यात विजेचा हमखास त्रास सहन करावा लागतो़ संततधार पाऊस असला तर पाऊस थांबेपर्यंत अंधारात राहावे लागते. महावितरणचे कर्मचारी नागरिकांना असभ्य वागणूक देतात व उडवाउडवीची उत्तरे देतात. गावातील नागरिक वा शेतकरी यांनी तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो़ शेतकरी, ग्राहकांना वीज त्वरित दुरूस्त करून घ्यायची असल्यास तालुका अभियंता वा उपअभियंत्यांशी संपर्क करावा लागतो़ यानंतरच ग्राहकांना न्याय मिळतो़ अन्यथा खासगी लाईनमन शोधून दुरुस्ती करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो़ रात्रीला महावितरणचा लाईनमन गावात राहावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते़ या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या समस्यांत वाढ होत आहे़ खंडित झालेली वीज रात्रभर येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत गिरड ३३ केव्ही अंतर्गत कनिष्ठ अभियंता व सर्व लाईनमनला मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)