शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

हतबल 467 शेतकऱ्यांना मिळणार 39.24 लाखांची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

वर्धा जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे उभ्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदतीची मागणी होताच, महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून तालुका प्रशासनाला आपला अहवाल सादर केला. त्यानंतर, तालुका प्रशासनाने त्यावर योग्य कार्यवाही करून सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. शासनाच्या याच आदेशान्वये वर्धा जिल्हा प्रशासनाला ३९ लाख २४ हजार ५०० रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, तो जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला जात आहे.वर्धा जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे उभ्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदतीची मागणी होताच, महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून तालुका प्रशासनाला आपला अहवाल सादर केला. त्यानंतर, तालुका प्रशासनाने त्यावर योग्य कार्यवाही करून सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला. जिल्हा प्रशासनानेही हवालदिल शेतकऱ्यांच्या विषयी सहानुभूती दाखवत सदर प्रस्ताव तातडीने शासनाला सादर केला. त्यानंतर, आता राज्य शासनाने या विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर करून, वर्धा जिल्हा प्रशासनाला ३९ लाख २४ हजार ५०० रुपयांचा निधी दिला आहे. तो जिल्हा प्रशासनाला तालुका प्रशासनाकडे वळता केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासकीय मदतीची रक्कम वळती केली जात आहे. कुठलाही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. 

आर्वी तालुक्यात सर्वाधिक नुकसान-    मार्च, एप्रिल व मे महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले. वर्धा तालुक्यातील १४.३० हेक्टर, सेलू तालुक्यातील ७.३० हेक्टर, देवळी तालुक्यातील ३.२५ हेक्टर, आर्वी तालुक्यातील २५२.०७ हेक्टर तर कारंजा तालुक्यातील २ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते, तशी नाेंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती