शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बलात्काऱ्यांना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:53 IST

जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली.

ठळक मुद्देभीम आर्मीची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम आर्मीच्या वतीने धडक मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के, जिल्हासंघटक आशिष मेश्राम यांनी केले.यावेळी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात काही दिवसांपूर्वी जम्मु-काश्मिरमधील कठूवा, उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे बलात्काराच्या घटना घडल्या. याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटंूबीयांना योग्य न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या देशभरात बलात्कार, अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत असून सरकार गुन्हेगारांची पाठराखण करीत असल्याबाबत निषेध नोंदवत या अमानवी घटनांमधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.वर्धेकरांनीही नोंदविला निषेधवर्धा : आसिफा तसेच उन्नव येथील पीडितेवरील अन्यायाबाबतचा जनसामान्यांचा आक्रोश शासन दरबारी पोचविण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले.सरकारला पाठविण्यात आलेल्या निवेदनात, जम्मु येथील आसिफा या ८ वर्षीय बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या करणाºयांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. शासन गुन्हेगारांच्या पाठीशी उभे आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत देशात संविधानात्मक कायद्याची आणि मानवी हिताची शासनव्यवस्था निर्माण व्हावी व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.यावेळी आधार सामाजिक संघटनेचे प्रा.भास्कर इथापे, आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, धरामित्रचे डॉ. तारक काटे, ग्रामसेवा मंडळाच्या करुणा फुटाणे, मार्च फॉर सायन्सचे प्रा. अतुल शर्मा, अध्ययन भारतीचे हरिष इथापे, निर्माण फाउंडेशनचे अमीर अली अजानी, महिला लोक आयोगाच्या सुचिता ठाकरे, रोटरी क्लब आॅफ गांधी सिटीच्या संगीता इंगळे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे पंकज वंजारे, जिजाऊ ब्रिगेडच्या माया पवार, संभाजी ब्रिगेडचे मयुर डफळे, राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, सुभाष कांबळे, युवासोशल फोरमचे सुधीर पांगूळ, सलीम कुरेशी, किरण पटेवार, संजय पवार, विक्रम खडसे, स्वाती सगरे, भाग्यश्री बकाले, आरती नेटके, शशिकांत जावळेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.