शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:27 IST

पाणीटंचाईवर मात करण्यास्तव उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरींची; पण अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरांसह अनेक गावांतील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात.

ठळक मुद्देदुरूस्तीची यंत्रणा अपुरी : तक्रारीनंतरही कार्यवाहीला होतो विलंब

आॅनलाईन लोकमतवर्धा : पाणीटंचाईवर मात करण्यास्तव उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरींची; पण अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरांसह अनेक गावांतील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. दरवर्षी नवीन हातपंपावर मात्र नित्यनेमाने पैसा खर्च केला जातो. या उरफाट्या कारभारामुळे जिल्ह्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यात नवीन हातपंप करणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींमध्ये बोअर करणे आदी अनेक उपाय सूचविले जातात; पण हे करीत असताना जुन्या हातपंपांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. परिणामी, अनेक ठिकाणचे हातपंप बंद अवस्थेत दिसतात. वर्धा शहरातील गजानन नगर परिसरातील काही हातपंप मागील कित्येक दिवसांपासून बंद आहे. यासह म्हाडा कॉलनी तथा अन्य ठिकाणचे हातपंपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळेही हातपंप कुचकामी ठरू लागले आहेत. जिल्हा प्रशासन, जि.प. प्रशासनाने याकडे लक्ष देत हातपंप सक्षम करणे गरजेचे झाले आहे.आकोलीतील हातपंप तक्रार करूनही नादुरूस्त अवस्थेतआकोली - गोसावी नगर तथा हेटी येथील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप बंद असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या; पण संबंधित यंत्रणा दुरूस्तीबाबत तसदी घेत नाही.गोसावी नगर व हेटी येथील हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत कायम उदासीन भूमिका घेतली जात आहे. काही हातपंपांची चेन तुटली तर कुठे पाणी खोल गेल्याने हातपंप बंद आहे. यामुळे महिलांना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. ग्रामसेवक राजेंद्र बावणकर यांनी तक्रार करूनही दुरूस्तीचे वाहन आले नाही.दांडे झुकलेले हातपंप शोभेचेआकोलीसारखीच स्थिती जिल्ह्यातील अनेक गावांत आहे. हातपंप आहेत; पण कुठे पाणी खोल गेले तर कुठे दांड्यांनी माना टाकल्या आहेत. परिणामी, हे हातपंप शोभेचे ठरत आहेत. उपयोगाचे नसल्याने अनेक हातपंप माती, मुरूमामध्ये दबलेल्या स्थितीत आढळून येतात. त्या हातपंपाची दुरूस्ती करून ते उपयोगात आणण्याचे प्रयत्न कुठेही होताना दिसत नाही. दरवर्षी नवीन हातपंपांची मागणी मात्र वाढताना दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी अनेक गावांतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.