शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

यांत्रिकी अधिकाऱ्याविनाच हातपंप दुरूस्ती पथक

By admin | Updated: January 17, 2016 01:56 IST

ग्रामीण भागात पाणीटंचाई भासू नये म्हणून हातपंप देण्यात आलेत. या हातपंपाची देखभाल व दुरूस्ती करण्याकरिता पथकांची निर्मिती करण्यात आली.

एका पथकाकडे दोन तालुके : १३ वर्षांपासून हातपंप यांत्रिकीच नाहीविजय माहुरे सेलू ग्रामीण भागात पाणीटंचाई भासू नये म्हणून हातपंप देण्यात आलेत. या हातपंपाची देखभाल व दुरूस्ती करण्याकरिता पथकांची निर्मिती करण्यात आली. या पथकामध्ये यांत्रिकी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे असते; पण गत १३ वर्षांपासून यांत्रिकी अधिकारीच नाही. परिणामी, यांत्रिकी अधिकाऱ्याविना हातपंपाची देखभाल, दुरूस्ती केली जात आहे.सेलू व समुद्रपूर या दोन तालुक्यातील हातपंप दुरूस्तीसाठी एकच पथक आहे. महिन्याचे १५ दिवस हे पथक एका तालुक्यात तर उर्वरित १५ दिवसांत शासकीय सुट्या पाहता अवघे दहा ते अकरा दिवसच काम होते. एवढ्या अल्पावधीत बंद पडलेले हातपंप कसे दुरूस्ती होतील, हा प्रश्नच आहे. हातपंप दुरूस्तीसाठी नागरिकांना १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती अंतर्गत हातपंप असलेल्या गावाची संख्या ११२ असून ५७० हातपंप आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ पाहता यापैकी बहुतांश हातपंप बंद पडत असतात. १० ते ११ दिवसांत दुरूस्ती पथकाला सर्वच बंद असलेले हातपंप दुरूस्त करणे शक्य होत नाही. यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. तालुक्यात २००२ पूर्वी २५० हातपंप होते. तेव्हा दुरूस्ती पथकात यांत्रिकी अधिकारी कार्यरत होता. बारमाही दुरूस्ती पथकही या तालुक्यात राहत होते; पण यांत्रिकी पदावर कार्यरत तत्कालीन अधिकारी एम.एस. माळोदे हे २००२ मध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आजपर्यंत १३ वर्षांच्या काळात या पदावर नवीन व्यक्तीची नेमणूक करण्यात आली नाही. हातपंपाच्या दुरूस्ती व देखभालीकडे जि.प. लक्ष देत असून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा हे काम पाहते. हातपंपाची दुरूस्ती यांत्रिकीविना शासकीय अकुशल कामगारांवरच आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तीन-चार महिने हे दुरूस्ती पथक पूर्णवेळ तालुक्यात कार्यरत असले तरी बारमाही राहणे गरजेचे आहे. सेलू पं.स.त नुकतीच आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत पाणीटंचाईची सभा झाली. यात ३७ हातपंपांची मागणी करण्यात आली. दरवर्षी हातपंप वाढत असल्याने यांत्रिकीविना हातपंपाची दुरूस्ती कशी होणार, हा प्रश्नच आहे. यातील दोष दूर करण्यासाठी यांत्रिकीसह दुरूस्ती पथक बारमाही ठेवावे, अशी मागणी होत आहे.