शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटी खर्चूनही कार प्रकल्प अर्धाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:46 IST

शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.

ठळक मुद्देशेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. यावर सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून आणखी २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील कार नदी प्रकल्प शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे माघारी गेला आहे. प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमीनीचे मुल्यांकन करून पूर्ण अनुदान देणे अपेक्षित होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. प्रकल्पबाधित व्यक्तीला शासनसेवेत नोकरीचा लाभही नाही. प्रकल्पामधून ३५०० हेक्टरवर सिंचनाची व्यवस्था अपेक्षित होती; मात्र कालव्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडून आहे.मुख्य कालव्याचे तोंड बांधण्यात आले. उर्वरित अस्तरीकरण झाले नाही. सध्या कालव्यांना गवत, झाड झुडूपानी वेढा घातला आहे. याच कालव्यामधून शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याने मुळ रस्ताही हरविला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या तोंडावरचा भाग मोकळा केला नाही. त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यापूर्वीच सदरचा भाग झाकला असल्याचे दिसत आहे. सुसुंद्रा, माणीकवाडा, कोल्हाकाळी, तारासावंगा, साहूर, जामगाव या मौजा मधील ३५०० जमीन ओलिताअभावी पडून आहे.कार प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्पाबाबत माहिती देत नाही. शासनाकडून निधी येईल तेव्हा काम करू, अशी मोघम उत्तरे देवून वेळ मारून नेत आहे. शेतकºयांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्या जाते; मात्र वर्षानुवर्षे सदरचे आश्वासन हवेतच विरत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला मार्गी लावून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी कार प्रकल्पातील शेतकºयांनी केली आहे.