शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने फेरले रबीवर पाणी

By admin | Updated: March 7, 2016 01:53 IST

जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात रोजच सांयकाळी पाऊस येत आहे.

आठवड्यापासून अवकाळी पाऊस सुरूच : गहू, चणा अजूनही शेतातचवर्धा : जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात रोजच सांयकाळी पाऊस येत आहे. रविवारी सायंकाळी रोहणा, आंजी (मोठी) परिसरात पावसासह गारपीट झाले. सेलू परिसरात पावसाच्या सरी पडल्या. सतत होत असलेल्या या पावसामुळे गहू व इतर पीक धोक्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या नुकसानीचा सकाळी सर्व्हे झाल्यानंतर त्याच गावात सायंकाळी पाऊस येत असल्याने सर्वेक्षणही कागदावरच होत असल्याचे दिसून आले आहे.शनिवारी समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पाऊस आला. समुद्रपूर परिसरातील गिरड, मोहगाव, साखरा, समुद्रपूर जाम परिसरात गारपीट झाले. यामुळे शेतातील गहू झोपला. जिल्ह्यात गत आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस आपली हजेरी लावत आहे. या पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. शासनाचे अधिकारी शेताच्या बांधापर्यंत अजूनही पोहचला नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क) हिंगणघाट तालुक्यात घरांची पडझड हिंगणघाट : शनिवारी सायंकाळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सुमारे सव्वाशे हेक्टर मधील पिकांच्या नुकसाणीचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक गावात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आ. समीर कुणावार यांनी या गावात जात प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या गारपिटीमुळे १०० हेक्टर मधील गहू व २५ हेक्टर चन्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार दीपक करंडे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील वणी, दाभा, कानापूर, खैराटी, बोरगाव या गावांना सर्वाधिक गारपीटीचा फटका बसला. वणी येथे सर्वाधिक घरांचे नुकसान झाले. त्यापैकी काही झोपड्या जमीनदोस्त झाल्या.