शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

गारपिटीने फेरले रबीवर पाणी

By admin | Updated: March 7, 2016 01:53 IST

जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात रोजच सांयकाळी पाऊस येत आहे.

आठवड्यापासून अवकाळी पाऊस सुरूच : गहू, चणा अजूनही शेतातचवर्धा : जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात रोजच सांयकाळी पाऊस येत आहे. रविवारी सायंकाळी रोहणा, आंजी (मोठी) परिसरात पावसासह गारपीट झाले. सेलू परिसरात पावसाच्या सरी पडल्या. सतत होत असलेल्या या पावसामुळे गहू व इतर पीक धोक्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या नुकसानीचा सकाळी सर्व्हे झाल्यानंतर त्याच गावात सायंकाळी पाऊस येत असल्याने सर्वेक्षणही कागदावरच होत असल्याचे दिसून आले आहे.शनिवारी समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पाऊस आला. समुद्रपूर परिसरातील गिरड, मोहगाव, साखरा, समुद्रपूर जाम परिसरात गारपीट झाले. यामुळे शेतातील गहू झोपला. जिल्ह्यात गत आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस आपली हजेरी लावत आहे. या पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. शासनाचे अधिकारी शेताच्या बांधापर्यंत अजूनही पोहचला नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क) हिंगणघाट तालुक्यात घरांची पडझड हिंगणघाट : शनिवारी सायंकाळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सुमारे सव्वाशे हेक्टर मधील पिकांच्या नुकसाणीचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक गावात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आ. समीर कुणावार यांनी या गावात जात प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या गारपिटीमुळे १०० हेक्टर मधील गहू व २५ हेक्टर चन्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार दीपक करंडे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील वणी, दाभा, कानापूर, खैराटी, बोरगाव या गावांना सर्वाधिक गारपीटीचा फटका बसला. वणी येथे सर्वाधिक घरांचे नुकसान झाले. त्यापैकी काही झोपड्या जमीनदोस्त झाल्या.