शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

गारपीटग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: May 11, 2014 00:32 IST

गारपीटग्रस्तांना शासनाने मदत जाहीर केली. ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या याद्या कृषी व महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आल्या.

तळेगाव (श्या.) : गारपीटग्रस्तांना शासनाने मदत जाहीर केली. ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या याद्या कृषी व महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आल्या. या याद्या ग्रा. पं. कार्यालयात प्रसिध्द केल्यानंतर गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी ज्या बँकेचे खाते दिले. सदर बँकेत कृषी विभागातर्फे यादी व धनादेश दिल्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही. कारण चुकीचा खातेक्रमांक दिल्याने आर्थिक मदत खात्यात जमा झाली नाही. राज्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यात आलेल्या वादळी पावसाने कहर केला. तालुक्यात अकाली पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाच्यावतीने त्वरीत सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणात ५० टक्यांवर शेती पिकाचे नुकसान झाले त्या क्षेत्राची व बाधित शेतकर्‍यांची यादी करण्यात आली. पण बँकेच्या गलथान कारभाराने शेतकर्‍यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही. तळेगाव परिसरातील जुनोना, देवगाव, तळेगाव, रानवाडी, दैऊतपूर, टेंभा या भागातील जास्तीत जास्त शेतकरी बँक आॅफ महाराष्ट्र सोबत जोडल्याने या शेतकर्‍यांनी याच बँकेचे खाते क्रमांक दिले. मात्र खात्यात पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.(वार्ताहर)