शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कृषी जागृती सप्ताहातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: May 6, 2016 02:00 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालय १ ते ६ मेपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबवित आहे. सदर सप्ताहाचे उद्घाटन आमदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

१ ते ७ मेपर्यंत सप्ताह : विभागाकडून कृषी विषयक माहितीआर्वी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय १ ते ६ मेपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबवित आहे. सदर सप्ताहाचे उद्घाटन आमदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी जागृती सप्ताहामध्ये तालुक्यातील गावात सभा घेऊन कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आदी पिकांबाबतची माहिती दिली जात आहे. शिवाय कृषी विषयक विविध योजनांबाबतही गावोगावी सभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. बिज प्रक्रिया, माती परीक्षण, उताराला आडवी पेरणी, सरी वरंबा पद्धत, बियाणे बदल, कमी खर्चात करावयाची शेती, रासायनिक खताचा कमी वापर, सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.कृषी विभागाच्या विविध योजना यांत्रिकीकरण, राष्ट्रीयल फलोत्पादन अभियांतर्गत कांदा चाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देत जागृती केली जात आहे. कृषी जागृती सप्ताहामध्ये क्षेत्रीय स्तरावर मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक गावोगावी सभा घेत आहेत. खरीप हंगामातील पिकांची कमी खर्चात प्रती हेक्टर सरासरी वाढविणे आणि कृषी विभागाच्या विविध योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या कृषी जागृती सप्ताहाचा उद्देश आहे. सप्ताहाच्या यशाकरिता कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)जनजागृती सभाकोरा : कृषी विभागाच्यावतीने समुद्रपूर तालुक्यातील सर्व गावांत कृषी जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. आजपर्यंत वासी, आसोला, पवनगाव, गांगापूर, खापरी, चापापूर, खेक या गावांत शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. कोरा येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. यात कृषी सहायक बाबाराव वागदे, यांनी उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना, माती परिक्षण करूनच रासायनिक खताचा वापर, पिकांची निरक्षणे घेऊन किटकनाशकाची फवारणी करणे, पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बिज प्रक्रिया करणे व महत्त्व, कपासी पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड, तंत्रज्ञान, कडधान्याचा पीक पेरा वाढविणे व इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण चौधरी, राम पंढरे, चिंधू शेंडे, शाहु पंढरे व शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)