शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पुलाचे संरक्षक कठडे तुटले

By admin | Updated: April 24, 2017 00:26 IST

वर्धा-हिंगणघाट मार्गावरील बोरगाव (मेघे) व इंझापूर या दोन गावाना जोडणाऱ्या पुलाचे संरक्षण कठडे गत काही महिन्यांपूर्वी तुटले.

अपघाताची भीती : संभाव्य धोका टाळण्यासाठी दुरूस्तीची गरजवर्धा : वर्धा-हिंगणघाट मार्गावरील बोरगाव (मेघे) व इंझापूर या दोन गावाना जोडणाऱ्या पुलाचे संरक्षण कठडे गत काही महिन्यांपूर्वी तुटले. सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरू पाहत असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाहीची गरज आहे.कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून नाल्याच्या पुलाला निर्मितीच्यावेळी संरक्षण कठडे लावण्यात आले होते. कठडे नसल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आल्याचे तसेच अनेकांना जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तुटलेले संरक्षण कठड्यामुळे अपघाताची भीती बळावत असून त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.एकीकडे रस्ता सुरक्षा अभियानाच्यामाध्यमातून अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, तुटलेल्या संरक्षण कठड्याकडे दुर्लक्ष केल्या जाता असल्याने शासनाच्या उद्देशालाच खो मिळत आहे. या मार्गावर नेहमीच छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र, अनेक वर्ष लोटूनही तुटलेल्या कठड्याच्या दुरूतीकडे बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तुटलेल्या कठड्याची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)यशोदा नदीवरील तुटलेल्या पुलाच्या कठड्याकडे दुर्लक्षचवायगाव (नि.)- सरुळ मार्गावर यशोदा नदीवरील पुलाचे कठडे तुटलेले आहे. राळेगाव व चंद्रपूर जाण्यासाठी हा मार्ग सोईचा आहे. तसेच या मार्गावर मोठ्या कंपन्याही आहेत. या मार्गाने छोट्या-मोठ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.परिसरातील जनतेच्या दृष्टिने हा अतिशय महत्त्वचा पुल आहे. पण, यावरील कठडे तुटले आहे. आता पर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. पुलावरील तुटलेल्या संरक्षण कठड्यामुळे मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्याची संबंधित विभागाने दुरूस्ती करणे गरजेचे आहे.-योगिता देवढे, सरपंच बोरगाव(मेघे). बोरगाव(मेघे)-इंझापूर व सरुळ यशोदा नदीवरील या दोन्ही पुलावरील संरक्षक कठडे बनविण्याबाबत शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव टाकला आहे. मंजुरी मिळताच त्वरीत काम सुरू करण्यात येईल. - अनिल भुत, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देवळी.