शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पुलाचे संरक्षक कठडे तुटले

By admin | Updated: April 24, 2017 00:26 IST

वर्धा-हिंगणघाट मार्गावरील बोरगाव (मेघे) व इंझापूर या दोन गावाना जोडणाऱ्या पुलाचे संरक्षण कठडे गत काही महिन्यांपूर्वी तुटले.

अपघाताची भीती : संभाव्य धोका टाळण्यासाठी दुरूस्तीची गरजवर्धा : वर्धा-हिंगणघाट मार्गावरील बोरगाव (मेघे) व इंझापूर या दोन गावाना जोडणाऱ्या पुलाचे संरक्षण कठडे गत काही महिन्यांपूर्वी तुटले. सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरू पाहत असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाहीची गरज आहे.कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून नाल्याच्या पुलाला निर्मितीच्यावेळी संरक्षण कठडे लावण्यात आले होते. कठडे नसल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आल्याचे तसेच अनेकांना जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तुटलेले संरक्षण कठड्यामुळे अपघाताची भीती बळावत असून त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.एकीकडे रस्ता सुरक्षा अभियानाच्यामाध्यमातून अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, तुटलेल्या संरक्षण कठड्याकडे दुर्लक्ष केल्या जाता असल्याने शासनाच्या उद्देशालाच खो मिळत आहे. या मार्गावर नेहमीच छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र, अनेक वर्ष लोटूनही तुटलेल्या कठड्याच्या दुरूतीकडे बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तुटलेल्या कठड्याची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)यशोदा नदीवरील तुटलेल्या पुलाच्या कठड्याकडे दुर्लक्षचवायगाव (नि.)- सरुळ मार्गावर यशोदा नदीवरील पुलाचे कठडे तुटलेले आहे. राळेगाव व चंद्रपूर जाण्यासाठी हा मार्ग सोईचा आहे. तसेच या मार्गावर मोठ्या कंपन्याही आहेत. या मार्गाने छोट्या-मोठ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.परिसरातील जनतेच्या दृष्टिने हा अतिशय महत्त्वचा पुल आहे. पण, यावरील कठडे तुटले आहे. आता पर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. पुलावरील तुटलेल्या संरक्षण कठड्यामुळे मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्याची संबंधित विभागाने दुरूस्ती करणे गरजेचे आहे.-योगिता देवढे, सरपंच बोरगाव(मेघे). बोरगाव(मेघे)-इंझापूर व सरुळ यशोदा नदीवरील या दोन्ही पुलावरील संरक्षक कठडे बनविण्याबाबत शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव टाकला आहे. मंजुरी मिळताच त्वरीत काम सुरू करण्यात येईल. - अनिल भुत, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देवळी.