शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सर्वांगिण विकासासाठी शिवसेना स्वीकारणार सात गावांचे पालकत्व

By admin | Updated: September 21, 2015 02:03 IST

ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात.

पत्रपरिषद : शासकीय योजना कार्यान्वित करणार कारंजा (घा.) : ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात. मात्र या योजना कार्यान्वित होत नसल्याने त्या गरजूपर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामीण भाग आजही विकासापासून दूर असल्याचे चित्र पहायला मिळते. तालुक्यातील सात गावांचे पालकत्व घेऊन या गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश देशमुख यांनी दिली.कारंजा तालुक्यातील वाघोडा, सेलगाव (उमाटे), धामकुंड, जुनापाणी भालेवाडी, येनगाव, पिपरी या गावांचे पालकत्व स्विकारणार असून येथे शासकीय योजना कार्यान्वित करीत या योजनांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना देण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. गावाच्या विकासाकरिता लागणारा निधीची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. या सात सर्वांगीन विकासासाठी १५ आॅक्टोबरपासून उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता सदर गावातील सरपंच, कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येत आहे. शिवसैनिक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पात हागणदारीमुक्त गाव, सार्वजनिकस्थळी शौचालय बांधणे, दारूबंदीकरिता कार्यक्षम मंडळ स्थापन करणे, प्रलंबित शासकीय योजनांचा पाठपुरावा घेवून योजना मार्गी लावणे, शेतीला पुरक जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करून देणे, शासकीय योजना गरजूपर्यंत पोहचतील याची कआळजी घेणे, गावविकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार करून गरजुलआ न्याय मिळवून देणे, कारंजा तालुक्यात एस.टी. आगाराची निर्मिती आदी बाबींवर प्रकल्पात काम करण्याचे देशमुख यांनी सांगितले. पत्रपरिषदेत शिवसेना शहर प्रमुख संदीप गाखरे, तालुका प्रमुख प्रकाश घागरे, महिला प्रमुख ज्योती हरणे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)