शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

सर्वांगिण विकासासाठी शिवसेना स्वीकारणार सात गावांचे पालकत्व

By admin | Updated: September 21, 2015 02:03 IST

ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात.

पत्रपरिषद : शासकीय योजना कार्यान्वित करणार कारंजा (घा.) : ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात. मात्र या योजना कार्यान्वित होत नसल्याने त्या गरजूपर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामीण भाग आजही विकासापासून दूर असल्याचे चित्र पहायला मिळते. तालुक्यातील सात गावांचे पालकत्व घेऊन या गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश देशमुख यांनी दिली.कारंजा तालुक्यातील वाघोडा, सेलगाव (उमाटे), धामकुंड, जुनापाणी भालेवाडी, येनगाव, पिपरी या गावांचे पालकत्व स्विकारणार असून येथे शासकीय योजना कार्यान्वित करीत या योजनांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना देण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. गावाच्या विकासाकरिता लागणारा निधीची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. या सात सर्वांगीन विकासासाठी १५ आॅक्टोबरपासून उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता सदर गावातील सरपंच, कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येत आहे. शिवसैनिक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पात हागणदारीमुक्त गाव, सार्वजनिकस्थळी शौचालय बांधणे, दारूबंदीकरिता कार्यक्षम मंडळ स्थापन करणे, प्रलंबित शासकीय योजनांचा पाठपुरावा घेवून योजना मार्गी लावणे, शेतीला पुरक जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करून देणे, शासकीय योजना गरजूपर्यंत पोहचतील याची कआळजी घेणे, गावविकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार करून गरजुलआ न्याय मिळवून देणे, कारंजा तालुक्यात एस.टी. आगाराची निर्मिती आदी बाबींवर प्रकल्पात काम करण्याचे देशमुख यांनी सांगितले. पत्रपरिषदेत शिवसेना शहर प्रमुख संदीप गाखरे, तालुका प्रमुख प्रकाश घागरे, महिला प्रमुख ज्योती हरणे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)