शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताच्या रुग्णांत होतेय वाढ

By admin | Updated: April 9, 2016 02:26 IST

एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. जीवाची काहिली होणारे उन्ह तापत आहे.

आरोग्य विभाग सजग : बालकांमध्ये उष्म्याचे प्रमाण अधिक, दक्षता गरजेचीवर्धा : एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. जीवाची काहिली होणारे उन्ह तापत आहे. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आदी विषाणुजन्य आराजासह उष्माघाताचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. उष्माघाताबाबत आरोग्य विभागही सजग झाला आहे.उन्हाळ्यात प्रत्येकाने आवश्यक ती दक्षता घेतल्यास उष्माघात टाळता येतो. उन्हाळ्यात शारीरिक श्रमाची कामे करणे, इमारतीच्या बाहेर काम करणे, बॉयलर रूममध्ये तसेच अधिक तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे अश्या प्रकारे तापमानातील वाढत्या परिस्थितीत सतत काम करीत असलेल्यांना उष्माघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. यामुळे उन्हाळ्यात अशा ठिकणी काम करण्याचे टाळणे गरजेचे झाले आहे.सध्या शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये विषाणुजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला आदी आजारांचे रुग्णही अधिक दिसून येत आहे. यातच खासगी दवाखान्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जात आहे. यात विशेषत: लहान बालकांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामुळे चिमुकल्यांना उन्हात घेऊन जाऊ नये, असा सल्लाही दिला जात आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित काम थांबवावे, अशा रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर वा वातानुकुलित यंत्र असावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आदी उपाय जि.प. आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे. उन्हाळ्यात बाजारात उपलब्ध कृत्रिम शीतपेय टाळावे आणि घरी उपलब्ध असणाऱ्या पारंपरिक पेयांचा उपयोग करावा, असेही आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. यात ताजे ताक, कैरीचे पन्हे, ऊसाचा रस, लिंबु शरबत, शाहाळाचे पाणी, फळाचा रस आदी प्राशन करण्याचा सल्ला आरोग्य विभाग देत आहे. यामुळे शरीरातील पोषण द्रव्याची कमतरता भरून निघते. शिवाय शरीरामध्ये चैतन्य निर्माण होऊन उष्माघातापासून संरक्षण होऊ शकते.उष्माघाताची लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णलय, ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत, उपजिल्हा, ग्रामीण व सामान्य रुगणालयांत शीत कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)