शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

१८ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: January 9, 2017 01:39 IST

नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी

खासगी टँकरने पाणीपुरवठा : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आर्वी : नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऐन हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवासी चिंता व्यक्त करतात. येथील विहिरींना पाणी नाही तर कुपनलिका नादुरुस्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येणाऱ्या उन्हाळ्यात येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याकरिता चांगलीच भटकंती करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. ही भीषण परिस्थिती लक्षात घेता यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त केली जात आहे. येथील पाणीटंचाईच्या समस्येबाबत शासकीय अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना अवगत करुन देण्यात आले आहे. वारंवार विनंती करूनही अद्याप पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे आज येथील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. नेरी-मिर्झापूर गावाची लोकसंख्या ६५० असून या पुनर्वसनात तीन विहिरी आहे. या विहिरींना आताच पाणी नाही. त्याप्रमाणे या पुनर्वसनात सहा कुपनलिका आहे. त्यापैकी चार नादुरुस्त असून त्यातील केवळ दोनच कुपनलिका सुरू आहे. आता या कुपनलिकांना पाणी येत नाही. या पुनर्वसित गावातील समस्यांचे संबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची सुविधा प्रदान करण्यात आली नाही. मागण्यांची पुर्ती केली जात नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. गावातील कोणताही व्यक्ती मृत पावला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ४ कि.मी अंतर चालत जवे लागते. गावाला स्मशानभुमी दिली नाही. अनेक घरात अजुनही वीज जोडणी नाही. पक्के रस्ते नसून नाल्या बांधलेल्या नाही. गावाचे पुनर्वसन करताना केलेले रस्ते आता निरुपयोगी ठरत आहे. येथील परीस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नेरी-मिर्झापूरचे उपसरपंच बाळासाहेब सोनटक्के यांनी निवेदनातून दिला आहे. विविध मागण्यांचे निवेदन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना सादर करण्यात आले.(तालुका/शहर प्रतिनिधी) नेरी-मिर्झापूर पुनर्वसन वसाहतीतील प्रकार ४येथील एका कुपनलिकेतून नळयोजनेला पाणी पुरवठा होत होता. परंतु जलस्तर कमी झाल्याने कुपनलिका आटली आहे. शिवाय काही कुपनलिका नादुरुस्त आहे. येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे. ४१४ दिवसांपूर्वी येथे एक कुपनलिका खोदण्यात आली. परंतु त्याला अत्यल्प पाणी लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऐन हिवाळ्यात येथे टँकरने पाणीपुरवठा होत असून उन्हाळ्यात येथील पाणीटंचाई उग्ररुप धारण करणार असल्याचे दिसते.