शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१८ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: January 9, 2017 01:39 IST

नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी

खासगी टँकरने पाणीपुरवठा : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आर्वी : नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऐन हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवासी चिंता व्यक्त करतात. येथील विहिरींना पाणी नाही तर कुपनलिका नादुरुस्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येणाऱ्या उन्हाळ्यात येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याकरिता चांगलीच भटकंती करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. ही भीषण परिस्थिती लक्षात घेता यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त केली जात आहे. येथील पाणीटंचाईच्या समस्येबाबत शासकीय अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना अवगत करुन देण्यात आले आहे. वारंवार विनंती करूनही अद्याप पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे आज येथील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. नेरी-मिर्झापूर गावाची लोकसंख्या ६५० असून या पुनर्वसनात तीन विहिरी आहे. या विहिरींना आताच पाणी नाही. त्याप्रमाणे या पुनर्वसनात सहा कुपनलिका आहे. त्यापैकी चार नादुरुस्त असून त्यातील केवळ दोनच कुपनलिका सुरू आहे. आता या कुपनलिकांना पाणी येत नाही. या पुनर्वसित गावातील समस्यांचे संबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची सुविधा प्रदान करण्यात आली नाही. मागण्यांची पुर्ती केली जात नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. गावातील कोणताही व्यक्ती मृत पावला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ४ कि.मी अंतर चालत जवे लागते. गावाला स्मशानभुमी दिली नाही. अनेक घरात अजुनही वीज जोडणी नाही. पक्के रस्ते नसून नाल्या बांधलेल्या नाही. गावाचे पुनर्वसन करताना केलेले रस्ते आता निरुपयोगी ठरत आहे. येथील परीस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नेरी-मिर्झापूरचे उपसरपंच बाळासाहेब सोनटक्के यांनी निवेदनातून दिला आहे. विविध मागण्यांचे निवेदन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना सादर करण्यात आले.(तालुका/शहर प्रतिनिधी) नेरी-मिर्झापूर पुनर्वसन वसाहतीतील प्रकार ४येथील एका कुपनलिकेतून नळयोजनेला पाणी पुरवठा होत होता. परंतु जलस्तर कमी झाल्याने कुपनलिका आटली आहे. शिवाय काही कुपनलिका नादुरुस्त आहे. येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे. ४१४ दिवसांपूर्वी येथे एक कुपनलिका खोदण्यात आली. परंतु त्याला अत्यल्प पाणी लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऐन हिवाळ्यात येथे टँकरने पाणीपुरवठा होत असून उन्हाळ्यात येथील पाणीटंचाई उग्ररुप धारण करणार असल्याचे दिसते.