शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

१८ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: January 9, 2017 01:39 IST

नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी

खासगी टँकरने पाणीपुरवठा : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आर्वी : नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऐन हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवासी चिंता व्यक्त करतात. येथील विहिरींना पाणी नाही तर कुपनलिका नादुरुस्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येणाऱ्या उन्हाळ्यात येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याकरिता चांगलीच भटकंती करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. ही भीषण परिस्थिती लक्षात घेता यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त केली जात आहे. येथील पाणीटंचाईच्या समस्येबाबत शासकीय अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना अवगत करुन देण्यात आले आहे. वारंवार विनंती करूनही अद्याप पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे आज येथील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. नेरी-मिर्झापूर गावाची लोकसंख्या ६५० असून या पुनर्वसनात तीन विहिरी आहे. या विहिरींना आताच पाणी नाही. त्याप्रमाणे या पुनर्वसनात सहा कुपनलिका आहे. त्यापैकी चार नादुरुस्त असून त्यातील केवळ दोनच कुपनलिका सुरू आहे. आता या कुपनलिकांना पाणी येत नाही. या पुनर्वसित गावातील समस्यांचे संबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची सुविधा प्रदान करण्यात आली नाही. मागण्यांची पुर्ती केली जात नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. गावातील कोणताही व्यक्ती मृत पावला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ४ कि.मी अंतर चालत जवे लागते. गावाला स्मशानभुमी दिली नाही. अनेक घरात अजुनही वीज जोडणी नाही. पक्के रस्ते नसून नाल्या बांधलेल्या नाही. गावाचे पुनर्वसन करताना केलेले रस्ते आता निरुपयोगी ठरत आहे. येथील परीस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नेरी-मिर्झापूरचे उपसरपंच बाळासाहेब सोनटक्के यांनी निवेदनातून दिला आहे. विविध मागण्यांचे निवेदन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना सादर करण्यात आले.(तालुका/शहर प्रतिनिधी) नेरी-मिर्झापूर पुनर्वसन वसाहतीतील प्रकार ४येथील एका कुपनलिकेतून नळयोजनेला पाणी पुरवठा होत होता. परंतु जलस्तर कमी झाल्याने कुपनलिका आटली आहे. शिवाय काही कुपनलिका नादुरुस्त आहे. येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे. ४१४ दिवसांपूर्वी येथे एक कुपनलिका खोदण्यात आली. परंतु त्याला अत्यल्प पाणी लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऐन हिवाळ्यात येथे टँकरने पाणीपुरवठा होत असून उन्हाळ्यात येथील पाणीटंचाई उग्ररुप धारण करणार असल्याचे दिसते.