शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:59 IST

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यातच तालुक्यात जलसंकट

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील खुबगाव, वाठोडा, दहेगाव, पाचेगाव, गुमगांव, वाढोणा, पिंपळखुटा, चांदणी, रोहणा, वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, शिरपूर (बोके) आदी गावातील विहिरींनी मार्च महिन्याच्याच सुरूवातीला तळ गाठल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे उन्हाळ्याच्या पुढील दिवसांमध्ये हे जलसंकट भीषण रुप धारण करेल असा कयास बांधल्या जात आहे. तालुक्यातील बहूतांश नद्या कोरड्या पडल्या आहेत. शिवाय ज्या नदी पात्रात नाममात्र पाणीसाठा आहे तो पुढील तीन महिने टिकणार नसल्याने आताच प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय, सध्या शेतकऱ्यांसह पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. परंतु, पशुसंवर्धन विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असल्याने त्याच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह पशुपालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विहिरींना मुबलक पाणी असते तर चारा समस्येवर शेतकऱ्यांच्या सहकार्यने मात करता आली असती. परंतु, विहिरींनी तळ गाठल्याने पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. जंगलातही पाणी नसल्याने आणि वनविभागानेही कृत्रिम पाणवठे व्यवस्थित करीत त्यात पाणी न भरल्याने वन्यप्राणीही उन्हाळ्यात गावांकडे धाव घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महिलांना करावी लागतेय भटकंतीआर्वी शहरातील शिरपूर रोड, एल.आय.जी. कॉलनीच्या मागील भागातील वसाहतीत नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी ही उपाययोजना तेथील लोकसंख्येच्या मानाने अपुरी पडत आहे. हीच परिस्थिती शहरातील आणखी काही भागात आहे. काही नागरिकांनी याची माहिती लोकप्रतिनिधींना देत समस्या निकाली काढण्याची मागणी केली.