शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:59 IST

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यातच तालुक्यात जलसंकट

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील खुबगाव, वाठोडा, दहेगाव, पाचेगाव, गुमगांव, वाढोणा, पिंपळखुटा, चांदणी, रोहणा, वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, शिरपूर (बोके) आदी गावातील विहिरींनी मार्च महिन्याच्याच सुरूवातीला तळ गाठल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे उन्हाळ्याच्या पुढील दिवसांमध्ये हे जलसंकट भीषण रुप धारण करेल असा कयास बांधल्या जात आहे. तालुक्यातील बहूतांश नद्या कोरड्या पडल्या आहेत. शिवाय ज्या नदी पात्रात नाममात्र पाणीसाठा आहे तो पुढील तीन महिने टिकणार नसल्याने आताच प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय, सध्या शेतकऱ्यांसह पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. परंतु, पशुसंवर्धन विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असल्याने त्याच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह पशुपालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विहिरींना मुबलक पाणी असते तर चारा समस्येवर शेतकऱ्यांच्या सहकार्यने मात करता आली असती. परंतु, विहिरींनी तळ गाठल्याने पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. जंगलातही पाणी नसल्याने आणि वनविभागानेही कृत्रिम पाणवठे व्यवस्थित करीत त्यात पाणी न भरल्याने वन्यप्राणीही उन्हाळ्यात गावांकडे धाव घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महिलांना करावी लागतेय भटकंतीआर्वी शहरातील शिरपूर रोड, एल.आय.जी. कॉलनीच्या मागील भागातील वसाहतीत नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी ही उपाययोजना तेथील लोकसंख्येच्या मानाने अपुरी पडत आहे. हीच परिस्थिती शहरातील आणखी काही भागात आहे. काही नागरिकांनी याची माहिती लोकप्रतिनिधींना देत समस्या निकाली काढण्याची मागणी केली.