शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:59 IST

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यातच तालुक्यात जलसंकट

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील खुबगाव, वाठोडा, दहेगाव, पाचेगाव, गुमगांव, वाढोणा, पिंपळखुटा, चांदणी, रोहणा, वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, शिरपूर (बोके) आदी गावातील विहिरींनी मार्च महिन्याच्याच सुरूवातीला तळ गाठल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे उन्हाळ्याच्या पुढील दिवसांमध्ये हे जलसंकट भीषण रुप धारण करेल असा कयास बांधल्या जात आहे. तालुक्यातील बहूतांश नद्या कोरड्या पडल्या आहेत. शिवाय ज्या नदी पात्रात नाममात्र पाणीसाठा आहे तो पुढील तीन महिने टिकणार नसल्याने आताच प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय, सध्या शेतकऱ्यांसह पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. परंतु, पशुसंवर्धन विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असल्याने त्याच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह पशुपालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विहिरींना मुबलक पाणी असते तर चारा समस्येवर शेतकऱ्यांच्या सहकार्यने मात करता आली असती. परंतु, विहिरींनी तळ गाठल्याने पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. जंगलातही पाणी नसल्याने आणि वनविभागानेही कृत्रिम पाणवठे व्यवस्थित करीत त्यात पाणी न भरल्याने वन्यप्राणीही उन्हाळ्यात गावांकडे धाव घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महिलांना करावी लागतेय भटकंतीआर्वी शहरातील शिरपूर रोड, एल.आय.जी. कॉलनीच्या मागील भागातील वसाहतीत नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी ही उपाययोजना तेथील लोकसंख्येच्या मानाने अपुरी पडत आहे. हीच परिस्थिती शहरातील आणखी काही भागात आहे. काही नागरिकांनी याची माहिती लोकप्रतिनिधींना देत समस्या निकाली काढण्याची मागणी केली.