शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

शेताच्या कुंपनावरील जाळे पक्ष्यांकरिता कर्दनकाळ

By admin | Updated: January 10, 2017 00:48 IST

मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांकडे असलेले खराब जाळे विकत घेवून ते शेताचे कुंपन म्हणून बांधण्याचा प्रकार

 पाणवठ्यांलगतचा प्रकार : वनविभाग व ईआरसीएस इंडियाचे जाळे निर्मूलन अभियान वर्धा : मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांकडे असलेले खराब जाळे विकत घेवून ते शेताचे कुंपन म्हणून बांधण्याचा प्रकार बोर व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात होत असल्याचे समोर आले आहे. हे जाळे या भागात असलेल्या जलाशयात असलेल्या पाणवठ्यांवर येणाऱ्या पक्षांकरिता कर्दनकाळ ठरत आहे. पारदर्शक व अतिबारीक धाग्यांनी बनलेल्या जाळ्यात अडकून अनेक पक्षांना जीव गमवावा लागल्याचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे शेतातील जाळे काढण्याची मोहीम वनविभाग व ईआरसीएस इंडियाच्यावतीने राबविण्यात आली. ८० ते १०० रुपयात जाळ्यांची खरेदी ४पूर्व विदर्भात अनेक लहान - मोठी धरणे आहेत. जिथे व्यावसायिक मत्स्यमारी केली जाते. या मत्स्यमारीसाठी वापरले जाणारे जाळे काही दिवसात खराब होतात. हे खराब जाळे नजीकचे शेतकरी ८० ते १०० रुपयांत विकत घेतात. हे जाळे शेताच्या धुऱ्यावर बांधून संपूर्ण शेताला वेढल्या जाते. हे जाळे फार बारिक धाग्यांचे बनलेले असते. तसेच जवळपास पारदर्शक भासते व शेकडो पक्षी या जाळ्यामध्ये अडकून मृत्यूमुखी पडत आहेत. यामध्ये बहुतांश वेळी लहान पक्षी अडकतात व त्यांना खाण्यास शिकारी पक्षीदेखील त्यावर झडप घेतात व अडकून मरण पावतात. शेतकरी बांधवांच्या गैरसमजातून अश्याप्रकारचे जाळे लावण्याचा प्रकार घडत असून शेतकऱ्यांचा समस्या समजावून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. वन्यजीवांबद्दल असलेले विविध गैरसमज व अंधश्रद्धा आपल्याकडील वन्यजीव धोक्यात आणण्यास जबाबदार असून समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना केल्यास वन्यजीवांचे संवर्धन शक्य आहे. - संजय इंगळे तिगावकर, सदस्य, सल्लागार समिती, बोर व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन विकासात इतर वन्यजीवांप्रमाणेच पक्ष्यांचाही फार मोठा वाटा आहेत. पर्यटक येथील पक्षीजीवन बघण्यासाठी तसेच अभ्यासण्यासाठी येतात, असे असताना आपल्या परिसरात लावण्यात येणाऱ्या जाळ्यांमुळे पक्ष्यांची निसर्गातील संख्या कमी होत आहेत. अनेक दुर्मीळ पक्षीदेखील या जाळ्यामध्ये मारले जात आहेत. - पराग दांडगे, ईआरसीएस, इंडिया