शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

८५० किमीच्या वर्धा-कराड प्रवासाला मारूती चितमपल्लींकडून हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:08 IST

पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकलने भ्रमंती करावी असा संदेश देणाऱ्या ८५० किमीच्या वर्धा-कराड या सायकल यात्रेचा शुभारंभ पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

ठळक मुद्देबहारचा उपक्रम सायकल रॅलीतून पक्षी संवर्धनाचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्षी संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. इतकेच नव्हे तर शाळकरी मुला-मुलींमध्ये पक्षीप्रेम निर्माण केले पाहिजे. तसेच पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकलने भ्रमंती करावी असा संदेश देणाऱ्या ८५० किमीच्या वर्धा-कराड या सायकल यात्रेचा शुभारंभ पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. ही सायकल यात्रा बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. सदर सायकल स्वार कराड येथे आयोजित दुसऱ्या अ.भा. आणि ३२ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात सहभागी होणार आहेत.कराड येथे २३ व २४ नोव्हेंबरला पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात बहार नेचन फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वर्ध्यातील पक्षी मित्र सहभागी होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाºया वर्धेच्या पक्षी प्रेमींनी समाजाला पक्षी संवर्धनाचा संदेश देण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक तसेच बहारचे सचिव दिलीप वीरखडे हे वर्धा ते कराडपर्यंतचा प्रवास सायकलने करणार आहेत. ते शनिवारी कराडच्या दिशेने रवाना झाले आहे. या सायकलवारीला अरण्य ऋषी तथा पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी संजय इंगळे तिगावकर, डॉ. जयंत वाघ, पराग दांडगे, स्नेहल कुबडे, विनोद साळवे, रवींद्र पाटील, राहुल तेलरांधे, बाबाजी घेवडे, दीपक गुढेकर, मुरलीधर बेलखोडे, बी. एस. मिरगे, राजेंद्र लांबट, कौशल मिश्रा, अजय तिगांवकर, जयंत सबाने, वैभव देशमुख, अविनाश भोळे, राहुल वकारे, दर्शन दुधाने, सारांश फत्तेपुरिया, राजेंद्र लांबट, ज्योती तिमांडे, प्राजक्ता वीरखडे, डॉ. स्वाती पाटील, अनघा लांबट, पार्थ वीरखडे आदींची उपस्थिती होती.

सहा दिवसांचा प्रवासवर्धेवरुन निघालेली ही सायकलवारी कारंजा, मेहकर, लोणार, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, सातारा, मार्गे कराडला सहा दिवसात पोहोचणार आहे. हे सायकलस्वार सहा दिवसांच्या कालावधीत एकूण ८५० किमीचा प्रवास करणार आहे. हे सायकलस्वार ठिकठिकाणी थांबून निसर्ग प्रेमींशी संवाद साधणार आहेत.असा राहणार प्रवास१७ नोव्हेंबरला वर्धा ते कारंजा १३६ किमीचा प्रवास१८ नोव्हेंबर कारंजा-मालेगाव-मेहकरपर्यंतचा ११० किमीचा प्रवास१९ नोव्हेंबर मेहकर-लोणार-सिंदखेडराजा-जालनापर्यंतचा १२५ किमीचा प्रवास२० नोव्हेंबर जालना-औरंगाबाद-अहमदनगरपर्यंतचा १७६ किमीचा प्रवास२१ नोव्हेंबर अहमदनगर-दौंड-बारामतीपर्यंतचा १४९ किमीचा प्रवास२२ नोव्हेंबर बारामती-सातारा-कराडपर्यंतचा १३७ किमीचा प्रवास

टॅग्स :Socialसामाजिक