शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

‘ग्रीन आर्मी’ने गाठला २४ हजार सदस्यांचा पल्ला

By admin | Updated: May 4, 2017 00:40 IST

जगावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उभे ठाकल्याने पर्यावरणपूरक चळवळींचे महत्त्व वाढले आहे.

वन संवर्धनाचा उपक्रम : नोंदणीत सेलू तालुका अव्वल प्रशांत हेलोंडे   वर्धा जगावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उभे ठाकल्याने पर्यावरणपूरक चळवळींचे महत्त्व वाढले आहे. काही वर्षांपर्यंत केवळ सामाजिक संघटनांचा पुढाकार असलेल्या बहुतांश चळवळी आता शासनाने सक्तीच्या केल्या जात आहेत. यातच ‘ग्रीन आर्मी’चे उद्दीष्ट वन विभागाला देण्यात आले आहे. वन विभाग या उद्दिष्ट पूर्तीसाठी सरसावला असून वर्धा जिल्ह्याने २४ हजार सदस्य संख्येचा पल्ला गाठला आहे. वन विभागाकडून राष्ट्रीय हरित सेना हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जातो; पण त्याला विशेष महत्त्व दिले जात नव्हते. हा उपक्रम शाळांपूरताच मर्यादित झाला होता. आता वाढते प्रदूषण, पाणीटंचाई, वृक्षांची कत्तल व ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता ग्रीन आर्मीमध्ये कुणालाही सदस्य होता येणार आहे. यामुळे ही फौज वाढवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात वन विभागाला २४ हजार ७९४ सदस्यांची नोंद करता आली आहे. यात आर्वी तालुक्यात २ हजार ५१४, आष्टी २ हजार ९१५, देवळी ३३५, हिंगणघाट २ हजार १२३, कारंजा ४ हजार ९२८, समुद्रपूर ३ हजार २४४, सेलू ५ हजार ४९८ तर वर्धा तालुक्यात ३ हजार २३७ सदस्यांची नोंद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणासह माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यात जंगलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण व संवर्धन या तीनही बाबी महत्त्वाच्या असल्याने त्या दृष्टीने वन विभागाच्या कामाची दिशा ठरविण्यात आली आहे. राष्ट्रीय व राज्य वन धोरणानुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वृक्षाच्छादित असणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वातील कलम ४८ अ नुसार वन्यजीव पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला वन व वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनाची संधी उपलब्ध करून देणे आणि लोकसहभाग मिळविण्यासाठी ग्रीन आर्मी सशक्त करण्याचे उद्दिष्ट वन विभागाला देण्यात आलेले आहे. कोण होऊ शकतो सहभागी राज्यातील प्रत्येक नागरिक वैयक्तिकरित्या महाराष्ट्र हरित सेनेचा सदस्य होऊ शकतो. यात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी, अधिकारी (कार्यरत तसेच सेवानिवृत्त), खासगी संस्थांचे कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक यापैकी कुणालाही ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारता येऊ शकते. पर्यावरण संवर्धनासाठी सदस्यांकडून अपेक्षा ग्रीन आर्मीच्या सदस्य, स्वयंसेवकाने वन विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे अपेक्षित आहे. यात वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वन संरक्षणासाठी सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणना, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन यासह वनमहोत्सव कालावधीत राबविल्या जाणारे उपक्रम, वन्यजीव सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणाबाबत सर्व उपक्रमांमध्ये सहभाग अपेक्षित आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली आदी जनजागृती कार्यक्रमांत सहभाग तथा त्यांच्या क्षेत्रातील वन, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरणाशी निगडीत कार्यक्रम, उपक्रमांमध्ये सहभागाची अपेक्षा आहे सामूहिक नोंदणीचाही पर्याय सामूहिक स्वरुपातही सदस्य नोंदणी करता येते. यात निमशासकीय संस्था, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य होता येते. यासाठीही संकेतस्थळामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.