शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा विकास शक्य

By admin | Updated: May 22, 2014 01:27 IST

विदर्भात शेतकर्‍यांकडे दरडोई शेतीचे प्रमाण चांगले आहे; पण उत्पादनात फारशी सुधारणा दिसत नाही.

वर्धा : विदर्भात शेतकर्‍यांकडे दरडोई शेतीचे प्रमाण चांगले आहे; पण उत्पादनात फारशी सुधारणा दिसत नाही. शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या अधिक आहे; पण शेतीवर काम करणार्‍यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत आपली शेती गटाच्या माध्यमातून केल्यास उत्पादन खर्चात कपात होईल व उत्पादनात वाढ होईल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍याचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन समूह शेतीचे प्रणेते कृषीभूषण नाथराव कराड इंजेगाव (बिड) यांनी केले.

जा.ब. ग्रामविकास संस्था व जिल्हा प्रकल्प आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विकास प्रशिक्षण कार्यक्रम निमसडा व टाकळी (चणा) येथे घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिकारी गायकवाड होते.

नाथराव कराड पूढे म्हणाले की, समुहात शेतकर्‍यांना अधिक शिकता येते व अनुभवाचे आदान-प्रदान होत असल्याने नुकसान कमी होते. एकत्रीतपणे बियाणे, खतांची खरेदी व अनेक शेतीपयोगी निविष्ठांची खरेदी केल्यास २५ ते ३0 टक्केपर्यंतची बचत होऊ शकते, हे सप्रमाण त्यांनी विषद केले. शेतकर्‍यांना गारपीट, दुष्काळ, अतवृष्टी, वादळ, पूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सतत तोंड द्यावे लागते. संकटाशी सामना करताना शेतकरी हतबल होतो. आजच्या स्थितीत शेती अधिक आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर निघायचे असेल तर शेतकर्‍यांनी समुहशेतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामुहिक माती परिक्षण, एक गाव एक वाण, एकात्मिक कीड व्यवस्थापन आदी बाबी केल्यास पीपीपीमध्ये सहभागी संस्थांकडून उत्पादनाला ज्यादा दर प्राप्त होऊ शकते. ठिंबक सिंचनाकडे एकत्रित वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी खरीपाच्या पुर्वतयारीकरिता बियाणे, खतांच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सचिव सोहनी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय उपस्थित होते. प्रास्ताविक पानकर यांनी तर संचालन विनेश काकडे यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच प्रशांत निमसडकर, पराते, उपाध्ये, वर्‍हाडे, भोंगाडे, बन्सोड आदींनी सहकार्य केले. यावेळी टाकळी येथील शेतकरी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)