शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

प्लास्टिक ठरतेय गुरांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: August 19, 2016 02:13 IST

प्राणिमात्रावर प्रेम करणे ही फार चांगली बाब आहे; पण पुरेशी व्यवस्था न करता प्राण्यांचे हाल केले जात असल्याचे दिसून येते

मोकाट जनावरांवर ओढवतोय मृत्यू : गोपालकांनी दक्षता घेणे गरजेचे वर्धा : प्राणिमात्रावर प्रेम करणे ही फार चांगली बाब आहे; पण पुरेशी व्यवस्था न करता प्राण्यांचे हाल केले जात असल्याचे दिसून येते. यात आपली गुरे मोकाट सोडून त्यांचे आरोग्य खराब केले जात आहे. बुधवारी पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रममध्ये एका गाईचा मृत्यू झाला. गाईच्या पोटातून २५ ते ३० किलो प्लास्टिक निघाले. यामुळे मोकाट सोडलेल्या जनावरांकरिता प्लास्टीक कर्दनकाळच ठरत आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या गाई, बैलांना जेरबंद करण्याची मोहीम नगर परिषद प्रशासन एक महिन्यापासून राबवित आहे. यात जनावरे पकडून पिपल फॉर अ‍ॅनिमल्सद्वारे संचालित पशु अनाथ आश्रमात ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी पशु मालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे. यामुळे बहुतांश पशुपालक घरी जनावरे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने ती सोडवत नाहीत. या जनावरांना शहरात कचरा खाण्याची सवय जडलेली असते. यामुळे ही जनावरे हिरवा वा सुखा चारा खात नाही. कालांतराने कमजोरी येऊन गुरे खाली बसतात व बरेचदा या गुरांचा मृत्यूही होतो. यातीलच एक गाय करुणाश्रमात बुधवारी दगावली. शवविच्छेदनात सुमारे २५ ते ३० किलो प्लास्टिकचा कचरा गाईच्या पोटातून निघाला. यामुळे गोपालकांनी घरी गाई पाळताना केवळ श्रद्धेपोटी न पाळता त्यांच्या सकस आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. असे झाले तरच गोसेवा होऊ शकते. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना सडका भाजीपाला व कचरा खाण्याची सवय असल्याने गोठ्यात टाकलेला हिरवा चाराही ही जनावरे खात नाही. यामुळे पशुपालकांनी आपली पाळीव जनावरे मोकाट न सोडता घरीच काळजी घ्यावी, असे आवाहन पिपल फॉर अ‍ॅनिमल व पालिकेने केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)