शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत राज्यातील नऊ व्यक्तींना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:00 IST

Wardha News Tobacco Free Campaign राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देटोबॅको फ्री इंडिया पुरस्काराने सन्मानित नरोत्तम सेखसरिया व सलाम मुंबई फाउंडेशनचा उपक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्याच्या शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. हे अभियान सक्षम करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि व्यक्तींना टोबॅको फ्री इंडिया पुरस्कार आणि अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात राज्यातील ९ व्यक्तींचा समावेश आहे.

सलाम मुंबई फऊंडेशनच्यावतीने २००७-०८ पासून राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवित आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम शालेय आणि गाव स्तरावर अधिक मजबूत व्हावा याकरिता नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन ही सेवाभावी संस्थाही विकासात्मक कार्य करीत आहे. तंबाखू नियंत्रण कार्यास आधिक बळकटी देण्याकरिता दर दोन वर्षांनी देशभरातून पाच सेवाभावी संस्थांची आणि व्यक्तींची निवड केली जाते.  यावर्षी पाच सेवाभावी संस्था आणि दहा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना मिळणाऱ्या अनुदानातून समाजाचे आरोग्य चांगले राहावे, सर्व मुले आणि समाज तंबाखूमुक्त व्हावा यासाठी खर्च केले जातात. यावर्षी राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे व द युनियनचे क्षेत्रीय उपसंचालक डॉ. राणा सिंग यांच्या उपस्थितीत पुरस्कार व अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

देशातील सात राज्यात कार्यतंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ लाख २१ हजार ७६० शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या उपक्रमत आजापर्यंत ५८५ सेवाभावी संस्था सहभागी झाल्यात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  राज्यात १२ हजार १२१ डीएड आणि बीएड विद्यार्थी, १५ हजार ३८९ पोलीस प्रशिक्षित करण्यात आलेत. सलाम मुंबई फाउंडेशनच्या कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संस्थेला प्रदान केला आहे. महाराष्ट्रातील यशानंतर आता सलाम मुंबई फाउंडेशनने भारतातील सात राज्यांत तंबाखूमुक्त शाळांचे काम स्थानिक शासनासोबत सुरू केले आहे.

या व्यक्तींना मिळाले अनुदानतंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता राज्यातील ९ व्यक्तींना अनुदान देण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सरोज जगताप व ज्योती देशमुख, साताऱ्याचे अनिल नामदेव जाधव, नंदुरबारचे रवी गोसावी, यवतमाळ येथील कैलास गव्हाणकर, वर्ध्याचे नरेश वाघ, कोल्हापुरातील शशिकांत कदम, धुळ्याचे पंकज शिंदे व सांगलीचे रामचंद्र टोणे यांचा समावेश आहे.

अनुदान मिळालेल्या सामाजिक संस्थामुव्हमेंट फॉर अल्टनेर्टीव्ह अ‍ॅण्ड युथ अव्हेरणेस (कर्नाटक), एफर्ट संस्था (आंध्र प्रदेश), शिक्षित रोजगार केंद्र समिती (राजस्थान), बुंदेलखंड सेवा संस्थान (उत्तर प्रदेश) व बालाजी सेवा संस्थान (उत्तराखंड) या सेवाभावी संस्थांना अनुदान देण्यात आले आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी