शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
3
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
4
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
7
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
8
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
9
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
10
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
11
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
12
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
13
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
14
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
15
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
16
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
17
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
18
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
19
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
20
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?

निराधारांना अनुदान अत्यल्प

By admin | Updated: May 6, 2016 01:58 IST

केंद्र शासनाद्वारे जीवन मूल्य वृद्धींगत करणे, विकास साधण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत; ...

महागाईत ६०० रुपयांत कसे भागणार ? : निराधारांचा शासन, प्रशासनाला सवालपुरूषोत्तम नागपुरे आर्वीकेंद्र शासनाद्वारे जीवन मूल्य वृद्धींगत करणे, विकास साधण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत; पण या योजनांतील अत्यल्प अनुदान व त्यातही विलंब होत असल्याने निराधारांनी जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या निराधारांना ६०० रुपये प्रतिमाह अनुदान दिले जाते. या अल्प अनुदानात महिनाभर जगायचे कसे, असा सवाल लाभार्थी उपस्थित करीत आहेत.आर्वी उपविभागात शहर व ग्रामीण क्षेत्रामध्ये एकूण १९ हजार ४६२, आष्टीमध्ये ६ हजार ८०५ व कारंजा तालुक्यात ४ हजार ६११ लाभार्थी आहे. निराधार योजनेत प्रती लाभार्थी केवळ ६०० रुपये महिना अनुदान मिळते; पण शासनाच्या अनेक योजनांप्रमाणेच यातही नियमित अनुदान दिले जात नाही. कधी तीन महिने तर कधी सहा महिन्यांपर्यंत लाभार्थ्यांना आर्थिक लाभ मिळत नाही. महागाई प्रचंड वाढल्याने ही सहायता रक्कम कुचकामी ठरत असून उपजीविका करणे अवघड झाले आहे. या योजनेत १८ ते ६५ वर्षांतील निराधार व्यक्तींना राज्यशासनातर्फे प्रती व्यक्ती ६०० रुपये व एकाच परिवारात दोन व्यक्ती निराधार असल्यास ९०० रुपये आर्थिक मदत दिली जाते; पण योजनेतील बहुतांश लाभार्थी साक्षर नसल्याने पोस्ट वा बँकेतून पैसे उचलताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. १९८० मध्ये ही योजना सुरू झाली. प्रारंभी प्रती व्यक्ती दरमहा केवळ २५० रुपये व एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना ६०० रुपये आर्थिक मदत मिळत होती. तब्बल २८ वर्षांनंतर आर्थिक साह्यतेमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत मिळणारी ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याची ओरड होत आहे. अधिकारिक माहितीनुसार, या योजनेचा लाभ वयाच्या ६५ वर्षांपर्यंतच घेता येतो. यापेक्षा अधिक वय असणाऱ्या निराधारांसाठी इंदिरा गांधी निराधार योजना व महिला अनुदान योजना सुरू करण्यात आली होती; पण आता ही योजना वरील योजनेत सामावून घेण्यात आली आहे. यामुळे ६५ वर्षांवरील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेत सामावून घेण्यात आले आहे. उल्लेखनीय असे की, परिवार प्रमुखाच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पत्नीला लाभ मिळू शकतो; पण त्या व्यक्तीच्या १८ वर्षाखालील मुलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. असे असले तरी केवळ ६०० रुपयांमध्ये संपूर्ण परिवाराची उपजीविका कशी करायची, हा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत. निराधार योजनेत नाव देण्यासाठी तहसील स्तरावर समितीचे गठन केले आहे; पण बहुतांश नागरिकांना या योजनेची माहिती नाही. यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ही माहिती नसल्याने व ते उपलब्ध नसल्याने बहुतांश नागरिक निराधार असताना लाभापासून वंचित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संगणमत करून व खोटी कागदपत्रे तयार करून या योजनेत बोसग लाभार्थ्यांचा शिरकाव करीत असल्याचे दिसते. गठित समितीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे लाभधारकांची प्रकरणे केल्यानंतरही अधिकारी व कर्मचारी मलिदा मिळणाऱ्या प्रकरणांत रस घेतात. खरी प्रकरणे बाजूला ठेवून बोगस लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.आर्वी उपविभागात निराधार योजनेचे २२ हजार ८७७ लाभार्थीआर्वी तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे २ हजार ०७५, श्रावणबाळ योजनेचे ९ हजार ३८७, कारंजा तालुक्यात संजय गांधीचे १ हजार १६४, श्रावणबाळचे ३ हजार ४४७ तर आष्टी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १ हजार ५४९ व श्रावण बाळचे ५ हजार २५५ लाभार्थी आहेत. या प्रकरणांमध्ये अनेक बोगस लाभार्थ्यांचा शिरकाव संबंधित कर्मचाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. यातून कर्मचारीही महिन्याकाठी कमाई करीत असल्याची ओरड होत आहे. यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेमध्ये काय घोटाळा झाला, याबाबत मला सांगता येणार नाही. मला या विभागाचा कारभार हाती घ्यायला चार दिवसच झाले आहेत; पण चौकशी करण्यात येईल.- श्याम कावटी, संजय गांधी योजना प्रमुख, नायब तहसीलदार, आर्वी.