शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

नादुरूस्त विहिरीचे अनुदान रखडले; शेतकरी हतबल

By admin | Updated: May 28, 2016 02:13 IST

सततच्या नापिकीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारावी म्हणून अतिवृष्टीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.

रसुलाबाद : सततच्या नापिकीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारावी म्हणून अतिवृष्टीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. याकरिता दीड लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. मात्र रसुलाबाद येथील शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. पावसाळा तोंडावर आला तरीही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे विहिरीची दुरुस्ती झालेली नाही. या अनुदानाकरिता जिल्हानिहाय शेत सर्व्हे करण्यात आला. संबंधीत विभागाकडे याच्या याद्या तयार करुन मंजुरीस पाठविल्या. हे अनुदान १० ते १०० टक्केपर्यंत मिळते. येथील पात्र लाभार्थ्यात अंबादास बिजवे, एकनाथ सावरकर, देवीदास गवारते, नारायण गवराते, नंदू सावरकर, सुभाष पादोडे, प्रभाकर सावरकर, माधव बमनोटे, मुस्तफा खॉ पठाण, विजय चौधरी, विजय चौकुडे, अरूण कनेरी, विठ्ठल लोहकरे, देवराव रघाटाटे, वामन भलमे, सुभाष गुल्हाने, माया ढोके, अशोक अलोणे, चंद्रकांत पाटील, बंडू लोखंडे, भास्कर बांदरे, राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे. विहिरी दुरूस्तीकरिता अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी याची विचारणा संबंधित विभाकडे केली. तरीही समस्या कायम असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.पेरणीचा हंगाम आला तरीही विहीर दुरूस्तीचे कामाचे पत्रक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. निधीचा हप्ता प्राप्त झाला नाही. यातील पात्र शेतकरी आर्वी येथील कार्यालयात विचारण करण्यासाठी गेले. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी याचा पाठपुरावा केला. मात्र त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. या प्रकाराने लाभार्थी शेतकरी अडचणीत आले आहे.(वार्ताहर)