शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची विक्रमी आवक

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धाच्या मार्केट यार्डमध्ये मागील आठवड्यात धान्यमालाची या हंगामातील विक्रमी आवक

वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धाच्या मार्केट यार्डमध्ये मागील आठवड्यात धान्यमालाची या हंगामातील विक्रमी आवक झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकाचे उत्पन्न कमी झाले असताना वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत धान्य मालाची आवक दीडपटीने वाढली आहे. संचालक मंडळाने धान्य मालाची पाहणी करीत आढावा घेतला. यावेळी प्रस्तावित सुधारणाही सूचविण्यात आल्या.वर्धा बाजार समितीत मागील वर्षी सोयाबीन ८२ हजार क्विंटल तर यावर्षी १ लाख २० हजार क्विंटल आहे. कापूस १ लाख ४० हजार क्विंटल तर यंदा १ लाख ९० हजार क्विंटल खरेदी करण्यात आला आहे. बजाज चौकाजवळील भाजी बाजारात सुधारणेच्या दृष्टीकोनातून सेस वसुली, भाडेपट्टीत २० ते ३० टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. प्रस्तावित भाजी बाजार बांधकामाचा आराखडा तयार असून लवकरच अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा मानस आहे. सोयाबीन, चना, तूर व जिल्ह्यातील अन्य बाजार समितीपेक्षा सातत्याने शेतकऱ्यांना अधिक भाव मिळत आहे. बाजार समितीमार्फत ५ रुपयांत शेतकऱ्यांना भोजन दिले जाते. शेतकऱ्यांनी विकलेल्या शेतमालाचे चुकारे शेतमाल विकल्यानंतर लगेच मिळत आहे. कोणत्याही प्रकारची सूचना देण्यासाठी साऊंड सिस्टिम लावली आहे. संचालक मंडळ, चांगले व्यापारी व अडते, हमाल व मापारी आणि सहयोगी कर्मचारी यांची सांगड योग्यपणे बसली. कोणत्याही प्रकारची तक्रार न येता एकमेकांच्या साह्याने शेतकऱ्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे व सोई पुरविणे हेच उद्दिष्ट असल्याचे उपसभापती पांडुरंग देशमुख यांनी सांगितले. बाजार समिती यार्डमध्ये मागील आठवड्यात आलेल्या विक्रमी धान्याची पाहणी करताना शेतकऱ्यांशी चर्चा करीत होते. याप्रसंगी सभापती शरद देशमुख, उपसभापती पांडुरंग देशमुख, संचालक श्याम कार्लेकर, रमेश खंडागळे, विजय बंडेवार, प्रकाश पाटील, मुकेश अळसपुरे, पवन गोडे, शरद झोड, दत्ता महाजन, सुरेशसिंग मेहर, जगदीश मस्के, भूषण झाडे, अरविंद भुसारी, दिनेश गायकवाड, कमलाकर शेंडे, वैशाली उमाटे, अपर्णा मेघे, सचिव समीर पेंडके, सहा. सचिव माधव बोकाडे, व्यापारी भंवरलाल चांडक, जुगलकिशोर चांडक, कैलास काकडे, अडते प्रशांत जगताप, साटोणे, आतिक, नासरे, ढवळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बाजार समिती शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अधिकाधिक सोई पुरविण्याचे प्रयत्न केले जातील, असे मत उपसभापती देशमुख व संचालकांनी व्यक्त केले.(कार्यालय प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ करणार४वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असताना विक्रमी आवक झाली आहे. सोयाबीन, कपाशीच्या खरेदीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात ही नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीवर विश्वास टाकल्याने अधिकाधिक सुविधा पुरविण्यावर भर देणार असल्याचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी बाजार समितीचा आढावा घेताना व्यक्त केले. शिवाय बजाज चौकातील भाजी बाजारालाही आधुनिक रूप देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. याबाबतचा आराखडा तयार असून ही कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही शेतकऱ्यांना सांगण्यात आले.