शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

शेतकºयांसाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:37 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पॅकेज दिले. मात्र आत्महत्या कमी झाल्या नाही. याकरिता समाजात चैतन्य निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

ठळक मुद्देवसंत ढवळे यांचे प्रतिपादन : २१ दिवसीय ग्रामगीता संगीत प्रवचनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पॅकेज दिले. मात्र आत्महत्या कमी झाल्या नाही. याकरिता समाजात चैतन्य निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच शेतकरी बांधव समाधानाने जगेल. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता या तंत्रज्ञानाच्या युगात संजीवनी बुटी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंताचे प्रचारक वसंतराव ढवळे यांनी केले.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी २१ दिवस ग्रामगीता संगीत प्रवचनाचे आयोजन केले होते. तीन आठवडे चाललेल्या प्रवचनात संपूर्ण ग्रामगीता वाचन करून उद्बोधन करण्यात आले. येथील गयामाय देवस्थानात आयोजित कार्यक्रमाला शेतकरी महिला, पुरूष उपस्थित होते.या कार्यक्रमात राष्ट्रसंतांचे चरित्र, ग्रामगीता, चिंतनातून महाराजांचे अमृततुल्य विचार शेतकºयांना ऐकवण्यात आले. गुरुवारी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. ग्रामसंघटनेच्या दृष्टीने सामुदायिक प्रार्थनेच महत्व सांगण्यात आले. सप्ताहात रामधून काढण्यात आली. ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्य यावर शेतकºयांना माहिती देण्यात आली.पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, समाज सुस्थितीत नांदावा सर्वांनी मिळून स्वर्गतुल्य सुख निर्माण करावे. सर्वांगिक विकास व्हावा, संस्कृती व एकोपा कायम ठेवून मोबाईलच्या लोच्यात न पडता माणूस आणि माणुसकी याची सांगड घाला. शेतकरी सुद्धा माणूस आहे. जबाबदारी, नैतिक कर्तव्य, समजून जो वागतो त्याला धर्म म्हणतात. परस्परांशी वागणूक ज्यात न्यायनिती सम्यक, प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव, हाच खरा धर्म होय, राष्ट्रसंताचे साहित्य व विचार शेवटच्या लोकांपर्र्यंत पोहचविणे हाच खरा आर्त संदेश होय. या ग्रंथांचा विचार घरोघरी पोहचवावा असे आवाहन केले.समारोपीय कार्र्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोद बुरंगे, दामोधर भोपने, यशवंत लाडवीकर, देविदास सिसट, दिलीप पोकळे हे उपस्थित होते. यावेळी विठ्ठल कांदे, आशिष मोहोड, रोशन काकपुरे यांचा साहित्य दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुभाष लोहे, विठ्ठल कांदे, वसंत जवळेकर यांनी राष्ट्रसंत विचारावर निरूपण केले.श्रावण विजेकर, रामभाऊ दारोकर यांनी टाळ मृदुंगांची साथ दिली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकºयांना दिली शपथया कार्यक्रमात गुरूदेव भक्तांच्या उपस्थितीत शेतकºयांना सेंद्रीय शेती करून प्रत्येकाने गाय, बैल हे प्राणी पाळावे, अशी शपथ देण्यात आली. शेती विकसीत करण्यासाठी जनावरांचे खत, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, चारा संकलन केंद्र, गांडूळ खत युनिट तयार करण्याची माहिती दिली.