शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

शेतकºयांसाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:37 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पॅकेज दिले. मात्र आत्महत्या कमी झाल्या नाही. याकरिता समाजात चैतन्य निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

ठळक मुद्देवसंत ढवळे यांचे प्रतिपादन : २१ दिवसीय ग्रामगीता संगीत प्रवचनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पॅकेज दिले. मात्र आत्महत्या कमी झाल्या नाही. याकरिता समाजात चैतन्य निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच शेतकरी बांधव समाधानाने जगेल. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता या तंत्रज्ञानाच्या युगात संजीवनी बुटी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंताचे प्रचारक वसंतराव ढवळे यांनी केले.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी २१ दिवस ग्रामगीता संगीत प्रवचनाचे आयोजन केले होते. तीन आठवडे चाललेल्या प्रवचनात संपूर्ण ग्रामगीता वाचन करून उद्बोधन करण्यात आले. येथील गयामाय देवस्थानात आयोजित कार्यक्रमाला शेतकरी महिला, पुरूष उपस्थित होते.या कार्यक्रमात राष्ट्रसंतांचे चरित्र, ग्रामगीता, चिंतनातून महाराजांचे अमृततुल्य विचार शेतकºयांना ऐकवण्यात आले. गुरुवारी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. ग्रामसंघटनेच्या दृष्टीने सामुदायिक प्रार्थनेच महत्व सांगण्यात आले. सप्ताहात रामधून काढण्यात आली. ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्य यावर शेतकºयांना माहिती देण्यात आली.पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, समाज सुस्थितीत नांदावा सर्वांनी मिळून स्वर्गतुल्य सुख निर्माण करावे. सर्वांगिक विकास व्हावा, संस्कृती व एकोपा कायम ठेवून मोबाईलच्या लोच्यात न पडता माणूस आणि माणुसकी याची सांगड घाला. शेतकरी सुद्धा माणूस आहे. जबाबदारी, नैतिक कर्तव्य, समजून जो वागतो त्याला धर्म म्हणतात. परस्परांशी वागणूक ज्यात न्यायनिती सम्यक, प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव, हाच खरा धर्म होय, राष्ट्रसंताचे साहित्य व विचार शेवटच्या लोकांपर्र्यंत पोहचविणे हाच खरा आर्त संदेश होय. या ग्रंथांचा विचार घरोघरी पोहचवावा असे आवाहन केले.समारोपीय कार्र्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोद बुरंगे, दामोधर भोपने, यशवंत लाडवीकर, देविदास सिसट, दिलीप पोकळे हे उपस्थित होते. यावेळी विठ्ठल कांदे, आशिष मोहोड, रोशन काकपुरे यांचा साहित्य दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुभाष लोहे, विठ्ठल कांदे, वसंत जवळेकर यांनी राष्ट्रसंत विचारावर निरूपण केले.श्रावण विजेकर, रामभाऊ दारोकर यांनी टाळ मृदुंगांची साथ दिली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकºयांना दिली शपथया कार्यक्रमात गुरूदेव भक्तांच्या उपस्थितीत शेतकºयांना सेंद्रीय शेती करून प्रत्येकाने गाय, बैल हे प्राणी पाळावे, अशी शपथ देण्यात आली. शेती विकसीत करण्यासाठी जनावरांचे खत, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, चारा संकलन केंद्र, गांडूळ खत युनिट तयार करण्याची माहिती दिली.