शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

ग्रामसभा गुंडाळून ‘अर्ध्यावरती डाव सोडीला’

By admin | Updated: August 17, 2016 00:39 IST

स्वातंत्रदिनी विविध मुद्यांवर चर्चा होऊन सुरू झालेली पवनार येथील ग्रामसभा वादळी ठरली.

ग्रामस्थांमध्ये संताप : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच वर्धा : स्वातंत्रदिनी विविध मुद्यांवर चर्चा होऊन सुरू झालेली पवनार येथील ग्रामसभा वादळी ठरली. या सभेत चौदाव्या वित्त आयोगातून करावयाच्या कामांबाबतचे अनेक ठराव मंजूर झाले. परंतु गावातील मुख्य समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. त्यावर चर्चा करून तोडगा निघण्याआधीच सरपंच व सचिवांनी सभा गुंडाळली. त्यामुळे रोष व्यक्त होऊन नव्याने ग्रामसभा घेण्याचा मानस अनेकांनी यावेळी बोलून दाखविला. येथील सरपंच अजय गांडोळे, सचिव जोगे यांनी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत करावयाची कामे तसेच प्रस्तावित असलेल्या विकासकांमांबाबत माहिती दिली. ही बाब ग्रामस्थांना मान्य असली तरी गावातील मुलभूत समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. गावात नव्याने जलशुद्धीकरण बांधण्यात आले आहे. परंतु पाईपलाईनची व्यवस्था सदोष असल्याने अद्यापही ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागत आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेतच १२ फेब्रुवारी २०१६ पासून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल असे आश्वासन खुद्द सरपंचांनीच दिले होते. अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. सदोष कामामुळे ग्रामपंचायतने ही पाणीपुरवठा योजना स्वत:कडे घेतलेली नाही. त्याचप्रमाणे गावातील मोकाट वराहांचा प्रश्न, मटन मार्केट हटविण्याचा मुद्दा असे अनेक प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्रश्नांची जंत्री सुरू करताच एका नेत्याच्या स्वागतासाठी सदर ग्रामसभा अर्ध्यावरच गुंडाळण्यात आली. संतप्त ग्रामस्थांनी बराच वेळ नारेबाजी केली. गावातील एकाही समस्येवर ठोस चर्चा न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा ग्रामसभा घेण्याचा मानस व्यक्त केला.(शहर प्रतिनिधी)