शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतकरी आरक्षणासाठी ग्रामपंचायती सरसावल्या

By admin | Updated: July 2, 2017 00:44 IST

शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील भिष्णूर व धनोडी ग्रामपंचायतींनी ठराव पारित करून

भिष्णूर व धनोडी ग्रा.पं. ने घेतला ठराव : एकच मिशन शेतकरी आरक्षण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील भिष्णूर व धनोडी ग्रामपंचायतींनी ठराव पारित करून तो राज्य सरकारला पाठविला आहे. या संदर्भात लोक चळवळ उभी करण्याचा संकल्प शेतकऱ्यांचे मार्गदर्शक व प्रगतशील शेती संशोधक शैलेश अग्रवाल यांनी जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना घटनादत्त आरक्षण देण्यात यावे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, वेळ या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांसाठी नवे धोरण जाहीर करण्यात यावे, अशी मागणी पूढे येऊ लागली आहे. या दृष्टीकोणातून आर्वी तालुक्यात अनेक गावांनी पुढाकार घेत आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांसाठी शैक्षणिक सुलभ हप्त्यात उपलब्ध करावे, तारण विरहित कर्ज देण्यात यावे, सध्याची सहा लाखांची कर्जमर्यादा वाढवून देण्यात यावी. शेतमालाच्या खरेदी-विक्री पद्धतीत बदल करण्यात यावा, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यात यावी, यासाठी एकच मिशन शेतकरी आरक्षण हा नारा देऊन शेतकरी आता आपल्या हक्कासाठी लोक चळवळ उभी करण्याच्या तयारीत आहे. भिष्णूर व धनोडी या गावांनी शेतकरी आरक्षणाचा ठराव एकमताने पारित केला. यावेळी वर्धा पं.स.चे माजी सभापती संदेश किटे, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अनिल उमाटे, दिवाकर श्रावणकर यासह १०० शेतकरी सेवाग्राम आश्रमात या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते. एकच मिशन शेतकरी आरक्षण या अभियानाला व गावातील तरूण एकत्रित आले होते. या सर्वांना देवळी अभियंता भूपेश राऊत, आर्वी येथील पूजा चुडीवाल, वरूड येथील विक्रम व दर्शन देवघरे यांच्यासारख्या उच्चशिक्षितांची साथ या अभियानास मिळाली आहे. असे असेल आरक्षणाचे स्वरूप शासनाच्या विविध योजना ज्याप्रमाणे आरक्षणानुसार आरक्षित वर्गाला मिळते, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला आरक्षण देऊन या विविध लाभाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्यात. शेतकऱ्याच्या परिवाराला शिक्षण, नोकरी आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मुलांनी सातबारा व प्रकल्पग्रस्त असल्यास प्रमाणपत्र दाखल करून अंगणवाडी ते अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण मोफत मिळण्याची व्यवस्था आरक्षणातून व्हावी. आरक्षण देताना ज्याच्याकडे सातबारा आहे व जो प्रत्यक्ष शेती करतो वा ज्याची शेती सक्तीने संपादित करण्यात आली आहे, ते प्रकल्पग्रस्त, अशी शेतकऱ्यांची व्याख्या करावी.