शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायती पूर्णत: सौर ऊर्जेवर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:36 IST

भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प्रकल्प ........

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : सोलर पार्क, बांबू लागवडीसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प्रकल्प विकास आराखडे तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.सेवाग्राम येथील यात्री निवासात सेवाग्राम विकास आराखड्यातील १४५ कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी सूचना दिल्यात. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपअभियंता संजय मंत्री आणि अड्याळकर असोसिएटचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये एकूण ७८ कामे हाती घेण्यात आली असून पैकी १८ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.पर्यटकांना महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रासोबतच त्यांचा सहवास लाभलेल्या गावांचा इतिहास, भारताच्या संस्कृतीचे दर्शन आदींची माहिती थ्रीडी चित्र प्रर्दशित करणाऱ्या थिएटरद्वारे देण्यात यावी. गांधींजीचा सहवास लाभलेल्या २५ गांवाना सेवाग्राम सर्किट असे नाव देऊन त्या २५ ग्रामपंचायती पूर्णपणे सोलरवर कार्यान्वित करण्यासाठी ७५ कोटी रुपये देण्यात यावे, यासाठी परिसरात जागा शोधून १ मॅगावॅट वीजनिर्मिती करून सोलर पार्क तयार करावा, या सोलर पार्कमध्ये सोलर शेड तयार करून शेडमध्ये महिला बचतगटांना लघु उद्योगासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, सेवाग्राम परिसरात ५० एकर जागा उपलब्ध करून बांबू लागवड करावी. या बांबू लागवडीतून रोजगार हमी योजनेवरील मजुरांना कामे मिळून त्यांचा आर्थिक स्त्रोत वाढेल. या कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रशासनाने आराखडा तयार करून तत्काळ सादर करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.तत्पूर्वी त्यांनी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत झालेले हुतात्मा स्मारकासमोरील सभागृह, भारतातील सर्वात मोठा चरखा आणि यात्री निवासच्या कामाची पाहणी केली. यावेळी सभागृह परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. बैठकीनंतर त्यांनी बापूकुटीत जात प्रार्थना केली.दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करावर्धा: जिल्हा महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची पावनभूमी आहे. या दारुबंदी जिल्ह्यात देशी-विदेशी दारुविक्री जोमात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात दारुबंदीचे कडक कायदे करून दारुबंदीची कठोर अंमलबजावणी करावी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदार आणि दारुबंदी महिला मंडळांची वर्षातून दोनदा संयुक्त बैठक घ्यावी, प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्त केंद्रे सुरू करून दारू तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी, शासकीय कार्यालयात दारुबंदीसंदर्भात जनजागृती फलक लावावी, दारुबंदी महिला मंडळांना मानधन देण्यात यावे तसेच दारूच्या पंचनाम्यावर पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सरपंच किंवा दारुबंदी मंडळापैकी एक तरी सदस्यांची स्वाक्षरी असावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाखा प्रत्येक तालुक्यात सुरू करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आदी मागण्यांचे निवेदन महात्मा गांधी दारूमुक्ती संघटनेच्यावतीने पालकमंत्री बावनकुळे यांना देण्यात आले.घरकुल लाभार्थी महिलेने मागितली आत्महत्येची परवानगीवर्धा: आमगाव (मदनी) गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया म्हसाळा येथील रहिवासी असलेल्या अर्चना किसना मसराम यांना २०१७-१८ मध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले. तेव्हा २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर घराचे ले-आऊट टाकून राहते घर पाडण्यात आले. त्यानंतर काही उसनवारी रक्कम गोळा करून घराचा जोता बांधण्यात आला. त्यानंतर बाधकामासंदर्भात ग्रामपंचायत सचिवाला प्रमाणपत्र मागितले असता सचिवाने घर गावठाणात येत नसल्याचे कारण सांगून प्रमाणपत्र दिले नाही. घरकुल मंजूर झाले आणि पहिला धनादेशही निघाल्याने राहते घर पाडले. पण, आता हे बांधकामच रखडल्याने हा परिवार उघड्यावर आला आहे. या संदर्भात न्याय मिळण्याकरिता सरपंच, सचिव, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह आमदार, खासदार यांच्या भेटी घेतल्या; पण न्याय मिळाला नाही. सध्या किरायाच्या घरात दिवसे काढावे लागत असून कर्जबाजारीपणा वाढला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एक तर न्याय द्यावा अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी अर्चना मसराम यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPankaj Bhoyarपंकज भोयर