शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

अन् ग्रामपंचायत सदस्यांनीच घेतले खांद्यावर फवारणी पंप

By admin | Updated: October 8, 2014 23:29 IST

जिल्ह्यात डेंग्यूची साथ सुरू आहे. यावर प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. आरोग्य विभाग औषधोपचार करीत आहे. केवळ औषधोपचार करून यावर आळा मिळविणे शक्य नाही

वर्धा : जिल्ह्यात डेंग्यूची साथ सुरू आहे. यावर प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. आरोग्य विभाग औषधोपचार करीत आहे. केवळ औषधोपचार करून यावर आळा मिळविणे शक्य नाही तर स्वच्छता हा एकमेव उपाय असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले; मात्र येथील गामपंचायतीच्यावतीने याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: फवारणी पंप विकत आणून गावात फावारणी केली. ग्रा. पं. सावंगी (मेघे) क्षेत्रातील वॉर्ड क्र. ३ व ४ मध्ये अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यातही एकाचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाही सावंगी (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे काही सदस्यांनी वर्गणी गोळा करून फवारणी पंप खरेदी केले. केवळ पंपच नाही तर औषधी खरेदी करून त्याची गावात फवारणी केली. पावसाळ्यापूर्वी ग्रा. पं. सावंगी (मेघे) प्रशासनाने गावामध्ये स्वच्छता मोहीत राबविली नाही. गावातील नाल्या तुंबल्या आहेत. गावांमध्ये आरोग्य जागृतीची मोहीम राबविणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, असे उपक्रमही राबविण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळेच गावात डेंग्यूच्या आजाराची साथ पसरल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे अखेर ग्रा. पं. सदस्यांनी फवारणी यंत्र घेऊन प्रत्येक वॉर्डात फवारणी सुरू केली आहे. या संदर्भात ग्रा. पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांना गट विकास अधिकारी वर्धा यांना तक्रारी दिल्या आहेत. गावात फवारणी करण्याकरिता माजी सरपंच उमेश जिंदे, ग्रा. पं. सदस्य अमरजित फुसाटे, समाधान पाटील, महेंद्र गेडाम, रमा सोनपितळे, सरिता पारधी, वनिता जाधव, मीनाक्षी जिन्दे यांनी पुढाकार घेतला. त्यांना गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)