शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर धरणे

By admin | Updated: August 2, 2016 01:09 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे किमान वेतन दिले जाते; पण ते अत्यल्प असून त्यात नियमितता नाही.

वर्धा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे किमान वेतन दिले जाते; पण ते अत्यल्प असून त्यात नियमितता नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासह अन्य समस्याही प्रलंबित असून त्या त्वरित सोडवाव्या, या मागणीसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून धरणे दिले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांना निवेदनातून समस्या सोडविण्याचे साकडे घातले. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जि.प.वर धडकलेल्या मोर्चात जिल्ह्यातील ग्रा.पं. कर्मचारी सहभागी झाले. जि.प.च्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडविल्यानंतर शिष्टमंडळाने सीईओ गुंडे यांना निवेदन दिले. यावेळी सुमारे एक तास धरणे देण्यात आले. निवेदनानुसार, ग्रा.पं. कर्मचारी न.प. कर्मचाऱ्यांप्रमाणे गावातील सफाई, गटारे, पाणी, विद्युत पुरवठा, कर वसुली, पाणी शुद्धीकरण केंद्र, विविध योजना गाव पातळीवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे आदी कामे करतात. कर्मचारी २४ तास कार्यरत असताना त्यांना वेतनश्रेणी लागू नाही. यामुळे न.प. कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी नियम लागू करावा, १ जानेवारी २००० पासून किमान वेतन लागू केले. दर पाच वर्षांनी सुधारित किमान वेतनाचे दर लागू करणे गरजेचे होते; पण तसे न करता २००७ व २०१३ किमान वेतनाचे सुधारीत दर लागू केले. हा अन्याय असून सुधारित वेतनाची अधिसूचना जाहीर करावी. सेवाकाळात मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना नियुक्ती द्यावी. ग्रा.पं. कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित शासन निर्णयाला बगल देणाऱ्या ग्रा.पं. वर कार्यवाही करावी. कर्मचाऱ्यांना डॉ. दीपक मैसेकर समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी. ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे आकृतीबंध १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारे २१ जानेवारी २००० च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. गावाचे शहरीकरण झाल्याने राज्यात ६० हजार कर्मचारी सेवेत आहे. त्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी आदी मागण्या करण्यात आल्या.(कार्यालय प्रतिनिधी)