शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर धरणे

By admin | Updated: August 2, 2016 01:09 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे किमान वेतन दिले जाते; पण ते अत्यल्प असून त्यात नियमितता नाही.

वर्धा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे किमान वेतन दिले जाते; पण ते अत्यल्प असून त्यात नियमितता नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासह अन्य समस्याही प्रलंबित असून त्या त्वरित सोडवाव्या, या मागणीसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून धरणे दिले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांना निवेदनातून समस्या सोडविण्याचे साकडे घातले. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जि.प.वर धडकलेल्या मोर्चात जिल्ह्यातील ग्रा.पं. कर्मचारी सहभागी झाले. जि.प.च्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडविल्यानंतर शिष्टमंडळाने सीईओ गुंडे यांना निवेदन दिले. यावेळी सुमारे एक तास धरणे देण्यात आले. निवेदनानुसार, ग्रा.पं. कर्मचारी न.प. कर्मचाऱ्यांप्रमाणे गावातील सफाई, गटारे, पाणी, विद्युत पुरवठा, कर वसुली, पाणी शुद्धीकरण केंद्र, विविध योजना गाव पातळीवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे आदी कामे करतात. कर्मचारी २४ तास कार्यरत असताना त्यांना वेतनश्रेणी लागू नाही. यामुळे न.प. कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी नियम लागू करावा, १ जानेवारी २००० पासून किमान वेतन लागू केले. दर पाच वर्षांनी सुधारित किमान वेतनाचे दर लागू करणे गरजेचे होते; पण तसे न करता २००७ व २०१३ किमान वेतनाचे सुधारीत दर लागू केले. हा अन्याय असून सुधारित वेतनाची अधिसूचना जाहीर करावी. सेवाकाळात मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना नियुक्ती द्यावी. ग्रा.पं. कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित शासन निर्णयाला बगल देणाऱ्या ग्रा.पं. वर कार्यवाही करावी. कर्मचाऱ्यांना डॉ. दीपक मैसेकर समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी. ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे आकृतीबंध १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारे २१ जानेवारी २००० च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. गावाचे शहरीकरण झाल्याने राज्यात ६० हजार कर्मचारी सेवेत आहे. त्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी आदी मागण्या करण्यात आल्या.(कार्यालय प्रतिनिधी)