शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

ढोबळमानाने शेतकऱ्यांना मदतीची मागणी

By admin | Updated: March 29, 2017 00:58 IST

तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे.

आष्टी(श.) : तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे. पण शासकीय अधिकारी वास्तव मानायला तयार नाही. केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढू धोरणाचा स्वीकार होताना दिसत आहे. आत्महत्या झाल्याचे बोलके वास्तव पोलीस पंचनामा झाल्यावर समोर येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे अथवा नाही, त्याची आत्महत्या निकशात बसते अथवा नाही, याचा निर्णय घेण्याकरिता जिल्हाधिकारी, विविध अधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी या सर्वांची कमिटी त्यावर विचार करते. यामध्ये कागदी घोडे बरोबर नसल्याचे कारण पुढे करून मंजूर प्रकरण नामंजूर केल्या जाते. घरच्या कर्त्याने आत्महत्या केल्यावर जीवंत राहिलेली घरातील माणसे काळजीने मरणाच्या घटका मोजतात. ही सगळी वस्तुस्थिती शासनाने स्वीकारावी अशी समाजाकडून अपेक्षा असते. शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. प्रत्यक्ष अनुभवानुरूप येथे अपेक्षांचा भंग होत असल्याचे दिसते. गत अनेक वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात भरडल्या जात असलेला शेतकरी आशेवर जीवन जगत आहे. दरवर्षी पीक लागवडीचा खर्च व अत्यल्प उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्धार करतो. शेतकरी आत्महत्या झाल्यावर कुटुंबाचे सांत्वन करायला अधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांची उदासीनता दिसून येते. सामाजिक दायीत्व जोपासण्याचा निर्धार कुणीही स्विकारत नाही. शेतकऱ्यांसाठी शासनाने ढोबळमानाने मदत करायची मागणी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाला याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)