शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

ढोबळमानाने शेतकऱ्यांना मदतीची मागणी

By admin | Updated: March 29, 2017 00:58 IST

तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे.

आष्टी(श.) : तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे. पण शासकीय अधिकारी वास्तव मानायला तयार नाही. केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढू धोरणाचा स्वीकार होताना दिसत आहे. आत्महत्या झाल्याचे बोलके वास्तव पोलीस पंचनामा झाल्यावर समोर येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे अथवा नाही, त्याची आत्महत्या निकशात बसते अथवा नाही, याचा निर्णय घेण्याकरिता जिल्हाधिकारी, विविध अधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी या सर्वांची कमिटी त्यावर विचार करते. यामध्ये कागदी घोडे बरोबर नसल्याचे कारण पुढे करून मंजूर प्रकरण नामंजूर केल्या जाते. घरच्या कर्त्याने आत्महत्या केल्यावर जीवंत राहिलेली घरातील माणसे काळजीने मरणाच्या घटका मोजतात. ही सगळी वस्तुस्थिती शासनाने स्वीकारावी अशी समाजाकडून अपेक्षा असते. शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. प्रत्यक्ष अनुभवानुरूप येथे अपेक्षांचा भंग होत असल्याचे दिसते. गत अनेक वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात भरडल्या जात असलेला शेतकरी आशेवर जीवन जगत आहे. दरवर्षी पीक लागवडीचा खर्च व अत्यल्प उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्धार करतो. शेतकरी आत्महत्या झाल्यावर कुटुंबाचे सांत्वन करायला अधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांची उदासीनता दिसून येते. सामाजिक दायीत्व जोपासण्याचा निर्धार कुणीही स्विकारत नाही. शेतकऱ्यांसाठी शासनाने ढोबळमानाने मदत करायची मागणी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाला याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)