शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रा.पं. निवडणुकीचे लागले डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:49 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २९८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीस सुरूवात झाल्याचे चित्र बघावयास मिळते. यातच यंदा पहिल्यांदा अनेक गावात मतदार थेट सरपंच निवडणार आहे. परिणामी, राजकीय पक्षाकडून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यावर सध्या भर दिला जात आहे.

ठळक मुद्देराजकीय वातावरण तापण्यास सुरुवात : मोर्चेबांधणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २९८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीस सुरूवात झाल्याचे चित्र बघावयास मिळते. यातच यंदा पहिल्यांदा अनेक गावात मतदार थेट सरपंच निवडणार आहे. परिणामी, राजकीय पक्षाकडून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यावर सध्या भर दिला जात आहे.निवडणूक होणाऱ्या सर्वात जास्त ग्रामपंचायतींची संख्या हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील असून त्यापाठोपाठ निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींची संख्या देवळी तालुक्यातील आहे. मार्च महिन्यात निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींत आष्टी तालुक्यातील १७, कारंजा तालुक्यातील ३४, आर्वी २२, वर्धा ५६, देवळी ४६, सेलू ३१, हिंगणघाट ५६ तसेच समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राजकीय हालचालींचे चित्र पाहता भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसत आहे;पण कारंजा, आर्वी, आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतींतली लढत कॉँग्रेस, भाजप तसेच शिवसेनेच्या समर्थक उमेदवारांत होईल. हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक प्रामुख्याने राष्टÑवादी कॉँग्रेस, भाजप, सेना समर्थक उमेदवारांत होईल. वर्धा तसेच देवळी तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, कॉँग्रेस तसेच सेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या समर्थक उमेदवारांत होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत राजकीय शक्ती पणाला लावणार आहे. या ग्रा.पं.च्या निवडणुकीकरिता मतदारांची प्रारूपयादी १४ रोजी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहे. अंतिम मतदारयादी २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.जिल्ह्यात ५१९ ग्रामपंचायती आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडाच प्रत्येक गाव बनणार आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच याच महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू होईल, असे सांगितले जात आहे.२९८ गावांतील राजकीय गटातटांचे राजकारण सुरू होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे संदर्भ लक्षात घेता ग्रामपंचायतीत आपल्याच समर्थकांची सत्ता यावी, याकरीता कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे.प्रशासनाची कसरतकेंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी यादी तयार करण्याचे काम सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. तलाठ्यामार्फंत मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. त्यातच आता निवडणुकीची तयारीही प्रशासनाला करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.