शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

ग्रा.पं. निवडणुकीचे लागले डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:49 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २९८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीस सुरूवात झाल्याचे चित्र बघावयास मिळते. यातच यंदा पहिल्यांदा अनेक गावात मतदार थेट सरपंच निवडणार आहे. परिणामी, राजकीय पक्षाकडून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यावर सध्या भर दिला जात आहे.

ठळक मुद्देराजकीय वातावरण तापण्यास सुरुवात : मोर्चेबांधणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २९८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीस सुरूवात झाल्याचे चित्र बघावयास मिळते. यातच यंदा पहिल्यांदा अनेक गावात मतदार थेट सरपंच निवडणार आहे. परिणामी, राजकीय पक्षाकडून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यावर सध्या भर दिला जात आहे.निवडणूक होणाऱ्या सर्वात जास्त ग्रामपंचायतींची संख्या हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील असून त्यापाठोपाठ निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींची संख्या देवळी तालुक्यातील आहे. मार्च महिन्यात निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींत आष्टी तालुक्यातील १७, कारंजा तालुक्यातील ३४, आर्वी २२, वर्धा ५६, देवळी ४६, सेलू ३१, हिंगणघाट ५६ तसेच समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राजकीय हालचालींचे चित्र पाहता भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसत आहे;पण कारंजा, आर्वी, आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतींतली लढत कॉँग्रेस, भाजप तसेच शिवसेनेच्या समर्थक उमेदवारांत होईल. हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक प्रामुख्याने राष्टÑवादी कॉँग्रेस, भाजप, सेना समर्थक उमेदवारांत होईल. वर्धा तसेच देवळी तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, कॉँग्रेस तसेच सेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या समर्थक उमेदवारांत होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत राजकीय शक्ती पणाला लावणार आहे. या ग्रा.पं.च्या निवडणुकीकरिता मतदारांची प्रारूपयादी १४ रोजी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहे. अंतिम मतदारयादी २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.जिल्ह्यात ५१९ ग्रामपंचायती आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडाच प्रत्येक गाव बनणार आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच याच महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू होईल, असे सांगितले जात आहे.२९८ गावांतील राजकीय गटातटांचे राजकारण सुरू होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे संदर्भ लक्षात घेता ग्रामपंचायतीत आपल्याच समर्थकांची सत्ता यावी, याकरीता कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे.प्रशासनाची कसरतकेंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी यादी तयार करण्याचे काम सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. तलाठ्यामार्फंत मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. त्यातच आता निवडणुकीची तयारीही प्रशासनाला करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.