शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

शासन करतेय शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:50 IST

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली;....

ठळक मुद्देपत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचा आरोप : शेतमालाला हमीभाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली; पण केंद्र व राज्यात सत्ता येऊनही आश्वासन न पाळता शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे, असा आरोप पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी केला.शेतकरी संघटनेद्वारे सेवाग्राम ते आकोट तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे शहरात आगमन झाले असता विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपाने देशात दोन कोटी नोकऱ्या निर्माण करून बेरोजगारांना नोकºया देऊ, पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देऊ यासह अनेक आश्वासने दिली होती; पण चार वर्षे लोटूनही आश्वासनांची पूर्ती केली नाही. शेतकरी कर्जातच जन्मला व कर्जातच मरत आहे. कर्जापायी आत्महत्या करीत आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. शेतीला भविष्य नाही. या दुहेरी संकटात गावातील तरूण आहे. राज्यात सेना-भाजपाचे राज्य असताना शिवसेना सम्राटांनी २७ लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली. या रोजगार देण्याच्या घोषणा तर दूरच; पण भाजप शासन विद्यमान नोकऱ्यांत ३० टक्के कपात करीत आहे. स्वतंत्र विदर्भ देण्याची ग्वाही दिली होती; पण त्याकडेही पाठ फिरविली. आता शेतमालाचा भाव व बेरोजगारांची समस्या सोडविण्यासाठी संघटीतपणे एकत्र येऊन पुढील आंदोलनाचे धोरण ठरविण्यासाठी आकोट येथे विदर्भस्तरीय शेतकरी युवा मेळाव्यासाठी ही तिरंगा यात्रा जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी सतीश दाणी, गणेश मुटे, प्रमोद तलमले, गजानन निकम, नंदकुमार काळे, ब्रिजमोहन राठी व कार्यकर्ते हजर होते.