शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

शासन करतेय शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:50 IST

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली;....

ठळक मुद्देपत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचा आरोप : शेतमालाला हमीभाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली; पण केंद्र व राज्यात सत्ता येऊनही आश्वासन न पाळता शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे, असा आरोप पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी केला.शेतकरी संघटनेद्वारे सेवाग्राम ते आकोट तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे शहरात आगमन झाले असता विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपाने देशात दोन कोटी नोकऱ्या निर्माण करून बेरोजगारांना नोकºया देऊ, पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देऊ यासह अनेक आश्वासने दिली होती; पण चार वर्षे लोटूनही आश्वासनांची पूर्ती केली नाही. शेतकरी कर्जातच जन्मला व कर्जातच मरत आहे. कर्जापायी आत्महत्या करीत आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. शेतीला भविष्य नाही. या दुहेरी संकटात गावातील तरूण आहे. राज्यात सेना-भाजपाचे राज्य असताना शिवसेना सम्राटांनी २७ लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली. या रोजगार देण्याच्या घोषणा तर दूरच; पण भाजप शासन विद्यमान नोकऱ्यांत ३० टक्के कपात करीत आहे. स्वतंत्र विदर्भ देण्याची ग्वाही दिली होती; पण त्याकडेही पाठ फिरविली. आता शेतमालाचा भाव व बेरोजगारांची समस्या सोडविण्यासाठी संघटीतपणे एकत्र येऊन पुढील आंदोलनाचे धोरण ठरविण्यासाठी आकोट येथे विदर्भस्तरीय शेतकरी युवा मेळाव्यासाठी ही तिरंगा यात्रा जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी सतीश दाणी, गणेश मुटे, प्रमोद तलमले, गजानन निकम, नंदकुमार काळे, ब्रिजमोहन राठी व कार्यकर्ते हजर होते.