शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

शासन करतेय शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:50 IST

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली;....

ठळक मुद्देपत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचा आरोप : शेतमालाला हमीभाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली; पण केंद्र व राज्यात सत्ता येऊनही आश्वासन न पाळता शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे, असा आरोप पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी केला.शेतकरी संघटनेद्वारे सेवाग्राम ते आकोट तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे शहरात आगमन झाले असता विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपाने देशात दोन कोटी नोकऱ्या निर्माण करून बेरोजगारांना नोकºया देऊ, पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देऊ यासह अनेक आश्वासने दिली होती; पण चार वर्षे लोटूनही आश्वासनांची पूर्ती केली नाही. शेतकरी कर्जातच जन्मला व कर्जातच मरत आहे. कर्जापायी आत्महत्या करीत आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. शेतीला भविष्य नाही. या दुहेरी संकटात गावातील तरूण आहे. राज्यात सेना-भाजपाचे राज्य असताना शिवसेना सम्राटांनी २७ लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली. या रोजगार देण्याच्या घोषणा तर दूरच; पण भाजप शासन विद्यमान नोकऱ्यांत ३० टक्के कपात करीत आहे. स्वतंत्र विदर्भ देण्याची ग्वाही दिली होती; पण त्याकडेही पाठ फिरविली. आता शेतमालाचा भाव व बेरोजगारांची समस्या सोडविण्यासाठी संघटीतपणे एकत्र येऊन पुढील आंदोलनाचे धोरण ठरविण्यासाठी आकोट येथे विदर्भस्तरीय शेतकरी युवा मेळाव्यासाठी ही तिरंगा यात्रा जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी सतीश दाणी, गणेश मुटे, प्रमोद तलमले, गजानन निकम, नंदकुमार काळे, ब्रिजमोहन राठी व कार्यकर्ते हजर होते.