शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

शासनाने शेतकऱ्यांचा ‘सातबारा’ कोरा करावा

By admin | Updated: December 7, 2014 22:56 IST

विदर्भातील यंदाचा शेतीचा दुष्काळ भीषण आहे़ सोयाबीनची नापिकी लक्षणीय आहे़ मागील चार वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन ३० टक्केपेक्षा कमी आहे़ अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची

वर्धा : विदर्भातील यंदाचा शेतीचा दुष्काळ भीषण आहे़ सोयाबीनची नापिकी लक्षणीय आहे़ मागील चार वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन ३० टक्केपेक्षा कमी आहे़ अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली नाही़ रबीसाठी आवश्यक पाण्याची सुविधा जिल्ह्यात ९० टक्के शेतीसाठी अद्याप नाही़ कपाशीवर लाल्या आल्याने उत्पादन प्रभावित झाले़ अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे़ राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी केली़१२ डिसेंबरपासून सेवाग्रामहून नागपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पायदळ यात्रा करीत पाहुणचार आंदोलन करण्यात येत आहे़ याबाबतची माहिती देण्यासाठी देवळी येथे सभा घेण्यात आली़ यावेळी ते बोलत होते़ काकडे यांनी किसान अधिकार अभियानचे १०० प्रमुख कार्यकर्ते सेवाग्रामहून पायदळ निघतील़ १५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता बुटीबोरी येथे जिल्ह्यातील ३ हजार शेतकरी थेट सहभागी होतील, असे सांगितले़ विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील़ या दुष्काळाच्या परिस्थितीत शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट मदत करावी, कपाशीला ६ हजार रुपये भाव जाहीर करून शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील सर्व पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामे रोजगार हमी योजनेतून करावी आदी मागण्या आंदोलनातून लावून धरण्यात येणार आहेत़ सभेला पदाधिकारी, देवळी तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)