शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

शासनाने शेतकऱ्यांचा ‘सातबारा’ कोरा करावा

By admin | Updated: December 7, 2014 22:56 IST

विदर्भातील यंदाचा शेतीचा दुष्काळ भीषण आहे़ सोयाबीनची नापिकी लक्षणीय आहे़ मागील चार वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन ३० टक्केपेक्षा कमी आहे़ अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची

वर्धा : विदर्भातील यंदाचा शेतीचा दुष्काळ भीषण आहे़ सोयाबीनची नापिकी लक्षणीय आहे़ मागील चार वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन ३० टक्केपेक्षा कमी आहे़ अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली नाही़ रबीसाठी आवश्यक पाण्याची सुविधा जिल्ह्यात ९० टक्के शेतीसाठी अद्याप नाही़ कपाशीवर लाल्या आल्याने उत्पादन प्रभावित झाले़ अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे़ राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी केली़१२ डिसेंबरपासून सेवाग्रामहून नागपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पायदळ यात्रा करीत पाहुणचार आंदोलन करण्यात येत आहे़ याबाबतची माहिती देण्यासाठी देवळी येथे सभा घेण्यात आली़ यावेळी ते बोलत होते़ काकडे यांनी किसान अधिकार अभियानचे १०० प्रमुख कार्यकर्ते सेवाग्रामहून पायदळ निघतील़ १५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता बुटीबोरी येथे जिल्ह्यातील ३ हजार शेतकरी थेट सहभागी होतील, असे सांगितले़ विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील़ या दुष्काळाच्या परिस्थितीत शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट मदत करावी, कपाशीला ६ हजार रुपये भाव जाहीर करून शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील सर्व पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामे रोजगार हमी योजनेतून करावी आदी मागण्या आंदोलनातून लावून धरण्यात येणार आहेत़ सभेला पदाधिकारी, देवळी तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)