शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

शासनाने आमच्या जमिनीच संपादित कराव्या

By admin | Updated: July 31, 2014 00:10 IST

पावसाळ्यात धरणातील पाणी पातळी वाढताच अप्पर व लोअर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडणे अपरिहार्य झाले आहे़ पाणी सोडताच वर्धा नदीला पूर येणे आणि या पुरात हजारो हेक्टर जमीन पाण्यात दबणे,

शेतकऱ्यांची मागणी : प्रकल्पातील पाण्यामुळे जमीन बाधितरोहणा : पावसाळ्यात धरणातील पाणी पातळी वाढताच अप्पर व लोअर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडणे अपरिहार्य झाले आहे़ पाणी सोडताच वर्धा नदीला पूर येणे आणि या पुरात हजारो हेक्टर जमीन पाण्यात दबणे, हा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे़ दरवर्षीच नुकसान सोसावे लागत असल्याने परिसरातील शेतकरीही आता कंटाळले आहेत़ शासनाने आता आमच्या संपूर्ण जमिनीच अधिग्रहित करून घ्याव्यात, अशी मागणी केली आहे़ वर्धा नदीवर मोर्शी जि़ अमरावती येथे अप्पर वर्धा तर वर्धा जिल्ह्यातील धनोडी येथे निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ यात अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडले तर निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठा कमी करावाच लागतो़ या अपरिहार्य कारणांमुळे रोहणा परिसरातील गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो़ यात लाखो रुपयांचे नुकसान दरवर्षी होते़ या प्रकारातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी म्हणून रोहणा, दिघी, वाई, सायखेडा, वडगाव व दह्यापूर येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे शासनाने बाधित होणारी शेती संपादित करून जमिनीचा आजच्या बाजारभावाने मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे़वर्धा नदीच्या उगमस्थानापासून कुठेही सतत एक-दोन दिवस संततधार पाऊस आला तर पावसाळ्यात अप्पर व लोअर वर्धा या दोन्ही प्रकल्पांची दरवाजे उघडे करणे ही प्रकल्पांवरील अधिकाऱ्यांची अपरिहार्यता असते़ दरवाजे उघडे करून धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असताना पाऊस सुरू राहिल्यास वर्धा नदीला येऊन मिळणाऱ्या लहान-मोठ्या नदी, नाल्यांना पूर येतो़ अशावेळी वर्धा नदी फुगलेली राहत असल्याने परिसरातील नदी, नाल्याचे पाणी वर्धा नदीत सामाऊ शकत नाही़ अशावेळी नदी, नाल्यांचे पाणी काठावरील शेत जमिनीमध्ये शिरते़ या पाण्याने हजारो हेक्टरमधील पीक नष्ट होते़ ही परिस्थिती मागील दहा वर्षांपासून कायम आहे़ दरवर्षी पीक पेरणे आणि पुराने ते खराब होणे, हा अनुभव आहे़ शासन सर्व्हे करून कुणाला देते तर कुणाचे नाव अनुदान देताना सोडून देते़ मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून झालेल्या नुकसानाची १० टक्केही भरपाई होत नाही़ परिणामी, ज्यांच्या जमिनी बुडतात, ते शेतकरी शासकीय व खासगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे़ दरवर्षी होणाऱ्या या नुकसानामुळे शेतकऱ्यांची मानसिकता खराब झाली आहे़ पावसाळ्यात पूर येणार, धरणाचे पाणी सोडले जाणार, पुरात जमीन दबणार हे दृष्टचक्र आता यापुढे कधीच थांबणार नाही़ या कल्पनेने पीडित शेतकरी पेरणी करावी की नको, या संभ्रमात आहे़ शिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहे़ यातून वाचण्यासाठी साधारण पुरातही ज्या जमिनी बाधित होतात, अशा सर्व जमिनी शासनाने संपादित कराव्यात आणि बाजारभावाने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे़ सदर निवेदन पीडित शेतकरी पुष्पा कडू, लोकेश पाटील, गजेंद्र शिंदे, चंदू वाघ, रामकृष्ण कुंभलपुरे, बालू व पिंटू नांदविकर, मधुकर बुरघाटे, माधोराव जांभुळकर, शरद कडू, प्रमोद केणे, संजय रणनवरे यांनी सादर केले आहे़(वार्ताहर)