शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:21 IST

सर्वांकडून दुर्लक्षित शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनापासून दीडपट निर्धारित मुल्य शासनाने द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने केली होती. मात्र या अशासकीय प्रस्तावावर प्रारंभी बाजूने असलेले नेते निवडणूक येताच बदलले.

ठळक मुद्देराजू शेट्टी : निवडणूक येताच बदलले लोकप्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सर्वांकडून दुर्लक्षित शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनापासून दीडपट निर्धारित मुल्य शासनाने द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने केली होती. मात्र या अशासकीय प्रस्तावावर प्रारंभी बाजूने असलेले नेते निवडणूक येताच बदलले. यामुळे सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते आर्वी येथे आयोजित सभेत बोलेत होते.संसद भवनात निर्धारित मुल्य शेतकऱ्यांना दीडपट द्यावे या मागणीकरिता ५८ खासदारांनी आपले समर्थन दाखविले होते. परंतु निवडणूक येताच ठेवण्यात आलेल्या या अशासकीय प्रस्तावावर फक्त माझे एकच मत प्रस्तावाच्या बाजुला नोंदण्यात आले. शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्याकरिता त्यांच्या मालाला योग्य भाव न दिल्यास शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. त्याशिवाय सरकार शेतकऱ्यांच्या हितात निर्णय घेणार नाही. आज शेतकरी, शेतमजूर सोडला तर अन्य कोणाचीही अशी अवस्था झाली नाही. जी ही शासनाने शेतकऱ्यांची केलेली आहे.ग्रामीण क्षेत्रात भाजपाला जबरदस्त धक्का दिल्या गेला आहे. जशी प्रजा तसा राजा भेटत असते. निवडणुकीच्या वेळेला आपण जात-पात, दारू-पैसा व अनेक आश्वासन, प्रलोभन देऊन आपण मतदान करतो. त्याचेच परिणाम निवडून आल्या नंतर हे नेता लोक आपले तोंड उघडायला तयार होत नाहीत. शेतकऱ्यांनी आपली शक्ती निर्माण करावी आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करावे त्याकरिता स्वाभिमानी संघटना विपरीत स्थितीतही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, सरकारने रात्री ९.३० वाजता नोटबंदीचा निर्णय घेऊन करोडो रुपयाचे नुकसान केले. पंधरा लाख नोकऱ्या गमावल्या. शेतकऱ्यांनी सर्वात पहिली आत्महत्या १९८६ मध्ये केली. यावर अद्याप मार्ग काढण्यात आला नाही, आत्महत्या सुरूच आहेत. राजकर्त्यांना संवेदना व माणुसकी नाही. त्याच कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात चळवळ उभी करणार आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार असे परखड विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गावंडे, राजू गोरडे, शेतकरी नेते गजानन बंगाले, डॉ. गौरव वाघ यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक समस्यांसह आपले विचार प्रगट केले.कार्यक्रमाचे आयोजक प्रा. संजय वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा. कल्याणी वानखेडे यांनी केले. या सभेला आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होेते.