शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
4
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
5
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
6
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
7
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
8
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
9
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
10
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
11
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
12
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
13
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
14
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
15
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
16
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
17
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
18
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
19
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
20
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:21 IST

सर्वांकडून दुर्लक्षित शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनापासून दीडपट निर्धारित मुल्य शासनाने द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने केली होती. मात्र या अशासकीय प्रस्तावावर प्रारंभी बाजूने असलेले नेते निवडणूक येताच बदलले.

ठळक मुद्देराजू शेट्टी : निवडणूक येताच बदलले लोकप्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सर्वांकडून दुर्लक्षित शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनापासून दीडपट निर्धारित मुल्य शासनाने द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने केली होती. मात्र या अशासकीय प्रस्तावावर प्रारंभी बाजूने असलेले नेते निवडणूक येताच बदलले. यामुळे सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते आर्वी येथे आयोजित सभेत बोलेत होते.संसद भवनात निर्धारित मुल्य शेतकऱ्यांना दीडपट द्यावे या मागणीकरिता ५८ खासदारांनी आपले समर्थन दाखविले होते. परंतु निवडणूक येताच ठेवण्यात आलेल्या या अशासकीय प्रस्तावावर फक्त माझे एकच मत प्रस्तावाच्या बाजुला नोंदण्यात आले. शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्याकरिता त्यांच्या मालाला योग्य भाव न दिल्यास शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. त्याशिवाय सरकार शेतकऱ्यांच्या हितात निर्णय घेणार नाही. आज शेतकरी, शेतमजूर सोडला तर अन्य कोणाचीही अशी अवस्था झाली नाही. जी ही शासनाने शेतकऱ्यांची केलेली आहे.ग्रामीण क्षेत्रात भाजपाला जबरदस्त धक्का दिल्या गेला आहे. जशी प्रजा तसा राजा भेटत असते. निवडणुकीच्या वेळेला आपण जात-पात, दारू-पैसा व अनेक आश्वासन, प्रलोभन देऊन आपण मतदान करतो. त्याचेच परिणाम निवडून आल्या नंतर हे नेता लोक आपले तोंड उघडायला तयार होत नाहीत. शेतकऱ्यांनी आपली शक्ती निर्माण करावी आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करावे त्याकरिता स्वाभिमानी संघटना विपरीत स्थितीतही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, सरकारने रात्री ९.३० वाजता नोटबंदीचा निर्णय घेऊन करोडो रुपयाचे नुकसान केले. पंधरा लाख नोकऱ्या गमावल्या. शेतकऱ्यांनी सर्वात पहिली आत्महत्या १९८६ मध्ये केली. यावर अद्याप मार्ग काढण्यात आला नाही, आत्महत्या सुरूच आहेत. राजकर्त्यांना संवेदना व माणुसकी नाही. त्याच कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात चळवळ उभी करणार आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार असे परखड विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गावंडे, राजू गोरडे, शेतकरी नेते गजानन बंगाले, डॉ. गौरव वाघ यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक समस्यांसह आपले विचार प्रगट केले.कार्यक्रमाचे आयोजक प्रा. संजय वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा. कल्याणी वानखेडे यांनी केले. या सभेला आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होेते.