शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहातील संगणक धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:46 IST

समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले.

ठळक मुद्देप्रशिक्षकच नाही : समाज कल्याण विभागाचा गलथान कारभार, कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले. यासाठी २०११-१२ या सत्रात कॉम्प्यूटरची खरेदी करण्यात आले. देवळी येथील वसतिगृहात संगणक देण्यात आले; पण अद्यापही शिकविण्यासाठी प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. यामुळे वसतिगृहांतील संगणक बंद खोलीत धूळखात पडून आहे.राज्य शासनाने मागासवर्गीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण मिळावे या चांगल्या उद्देशाने ही योजना अमलात आणली. प्रारंभी या योजनेचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले; पण तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला असताना या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना कॉम्प्यूटर प्रशिक्षण देणारा शिक्षक महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे संगणकांचा वापरच होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षक नसल्याने विद्यार्थीच शिकतात आणि विद्यार्थीच शिकवितात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून धूळखात पडलेल्या या संगणकाच्या महत्त्वाच्या मुद्याकडे लोकप्रतिनिधी तथा अधिकाºयांचेही दुर्लक्ष होत आहे.वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणकाचे महागडे प्रशिक्षण मोफत मिळावे, हा उद्देश्य सफल होताना दिसून येत नाही. कॉम्प्यूटर प्रशिक्षण घेऊन पुढील जीवनात विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, ही चांगली कल्पना होती; पण शासकीय उदासिनतेमुळे हा चांगला उद्देश्य दुर्लक्षित राहिला आहे. वास्तविक, दोन -तीन वसतिगृह मिळून एक प्रशिक्षक नेमणे शासनासाठी फार कठीण बाब नव्हती; पण या योजनेकडेच शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देत संगणक सुरू करणे तथा योजनेचा लाभ देण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शासनाने लक्ष देत प्रत्येक वसतिगृहामध्ये प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृहातच संगणकाचे प्रशिक्षण देण्याची सोय करावी, अशी मागणी रिपाईचे नरेंद्र ओंकार यांनी निवेदनातून केली आहे.चांगल्या योजनेला प्रशासकीय उदासिनतेचे ग्रहणशासकीय वसतिगृहांमध्ये राहून ग्रामीण भागातील गरीब, होतकरू मुले शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना महागडे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. यामुळे शासनाच्यावतीने त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक उपलब्ध करून देण्यात आले; पण प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. शिवाय संगणकही बंद खोलीत पडून आहे. यामुळे चांगल्या योजनेला उदासिनतेचे ग्रहणच लागले आहे.