शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शासकीय वसतिगृहातील संगणक धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:46 IST

समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले.

ठळक मुद्देप्रशिक्षकच नाही : समाज कल्याण विभागाचा गलथान कारभार, कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले. यासाठी २०११-१२ या सत्रात कॉम्प्यूटरची खरेदी करण्यात आले. देवळी येथील वसतिगृहात संगणक देण्यात आले; पण अद्यापही शिकविण्यासाठी प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. यामुळे वसतिगृहांतील संगणक बंद खोलीत धूळखात पडून आहे.राज्य शासनाने मागासवर्गीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण मिळावे या चांगल्या उद्देशाने ही योजना अमलात आणली. प्रारंभी या योजनेचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले; पण तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला असताना या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना कॉम्प्यूटर प्रशिक्षण देणारा शिक्षक महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे संगणकांचा वापरच होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षक नसल्याने विद्यार्थीच शिकतात आणि विद्यार्थीच शिकवितात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून धूळखात पडलेल्या या संगणकाच्या महत्त्वाच्या मुद्याकडे लोकप्रतिनिधी तथा अधिकाºयांचेही दुर्लक्ष होत आहे.वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणकाचे महागडे प्रशिक्षण मोफत मिळावे, हा उद्देश्य सफल होताना दिसून येत नाही. कॉम्प्यूटर प्रशिक्षण घेऊन पुढील जीवनात विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, ही चांगली कल्पना होती; पण शासकीय उदासिनतेमुळे हा चांगला उद्देश्य दुर्लक्षित राहिला आहे. वास्तविक, दोन -तीन वसतिगृह मिळून एक प्रशिक्षक नेमणे शासनासाठी फार कठीण बाब नव्हती; पण या योजनेकडेच शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देत संगणक सुरू करणे तथा योजनेचा लाभ देण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शासनाने लक्ष देत प्रत्येक वसतिगृहामध्ये प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृहातच संगणकाचे प्रशिक्षण देण्याची सोय करावी, अशी मागणी रिपाईचे नरेंद्र ओंकार यांनी निवेदनातून केली आहे.चांगल्या योजनेला प्रशासकीय उदासिनतेचे ग्रहणशासकीय वसतिगृहांमध्ये राहून ग्रामीण भागातील गरीब, होतकरू मुले शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना महागडे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. यामुळे शासनाच्यावतीने त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक उपलब्ध करून देण्यात आले; पण प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. शिवाय संगणकही बंद खोलीत पडून आहे. यामुळे चांगल्या योजनेला उदासिनतेचे ग्रहणच लागले आहे.