शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

शासकीय वसतिगृहातील संगणक धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:46 IST

समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले.

ठळक मुद्देप्रशिक्षकच नाही : समाज कल्याण विभागाचा गलथान कारभार, कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले. यासाठी २०११-१२ या सत्रात कॉम्प्यूटरची खरेदी करण्यात आले. देवळी येथील वसतिगृहात संगणक देण्यात आले; पण अद्यापही शिकविण्यासाठी प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. यामुळे वसतिगृहांतील संगणक बंद खोलीत धूळखात पडून आहे.राज्य शासनाने मागासवर्गीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण मिळावे या चांगल्या उद्देशाने ही योजना अमलात आणली. प्रारंभी या योजनेचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले; पण तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला असताना या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना कॉम्प्यूटर प्रशिक्षण देणारा शिक्षक महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे संगणकांचा वापरच होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षक नसल्याने विद्यार्थीच शिकतात आणि विद्यार्थीच शिकवितात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून धूळखात पडलेल्या या संगणकाच्या महत्त्वाच्या मुद्याकडे लोकप्रतिनिधी तथा अधिकाºयांचेही दुर्लक्ष होत आहे.वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणकाचे महागडे प्रशिक्षण मोफत मिळावे, हा उद्देश्य सफल होताना दिसून येत नाही. कॉम्प्यूटर प्रशिक्षण घेऊन पुढील जीवनात विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, ही चांगली कल्पना होती; पण शासकीय उदासिनतेमुळे हा चांगला उद्देश्य दुर्लक्षित राहिला आहे. वास्तविक, दोन -तीन वसतिगृह मिळून एक प्रशिक्षक नेमणे शासनासाठी फार कठीण बाब नव्हती; पण या योजनेकडेच शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देत संगणक सुरू करणे तथा योजनेचा लाभ देण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शासनाने लक्ष देत प्रत्येक वसतिगृहामध्ये प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृहातच संगणकाचे प्रशिक्षण देण्याची सोय करावी, अशी मागणी रिपाईचे नरेंद्र ओंकार यांनी निवेदनातून केली आहे.चांगल्या योजनेला प्रशासकीय उदासिनतेचे ग्रहणशासकीय वसतिगृहांमध्ये राहून ग्रामीण भागातील गरीब, होतकरू मुले शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना महागडे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. यामुळे शासनाच्यावतीने त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक उपलब्ध करून देण्यात आले; पण प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. शिवाय संगणकही बंद खोलीत पडून आहे. यामुळे चांगल्या योजनेला उदासिनतेचे ग्रहणच लागले आहे.