शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजना राबविण्यास शासन अपयशी

By admin | Updated: March 17, 2016 02:52 IST

समाजाच्या तळागळातील नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने घरकूल योजना राबविली जात आहे.

शासनाचे दुर्लक्ष : गरीब लाभार्थी कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरीचे बळीतळेगाव (श्या.पंत.) : समाजाच्या तळागळातील नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने घरकूल योजना राबविली जात आहे. पण जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात अपयशी ठरत आहे. आष्टी तालुका याला अपवाद नाही. पंचायत समितीच्या उदासीन व वेळकाढू धोरणामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ग्रा.पं.द्वारे घरकूल लाभार्थ्यांची यादी पं. स. कडे पाठविली जाते. त्याच यादीतून शासनाने दिलेल्या लक्षांकानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ग्रा.पं.ने पाठविलेल्या यादीतून वर्गवारीनुसार व गुणानुक्रमानुसार निवड करून पंचायत समितीला पाठविण्यात येते. त्यानंतर पं.स. ग्रामपंचायतील निवड झालेल्या लाभार्थीची यादी करारनामा करण्याकरिता पाठविल्या जाते. वास्तवात शासनाकडून मंजूर होणाऱ्या घरकुलांची संख्या आणि लाभार्थ्यांच्या मागणी अर्जात मोठी तफावत दिसून येत आहे. आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गाला दिला जात होता. परंतु काही वर्षापासून एस.सी., एस.टी. याच लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ दिला जात आहे. एस.सी व एस.टी. लाभार्थी संपल्यानंतर ओ.बी.सी. ला लाभ मिळणार आहे. ओबीसी मध्येही गरजूंची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. तीनही प्रवर्गातून लाभार्थ्यांची निवड करून त्यांना लाभ देणे गरजेचे आहे.(वार्ताहर) ओबीसी लाभार्थी योजनेपासून वंचितदारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण विकास विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या इंदिरा आवास योजना, राजीव गांधी घरकुल योजनेचा लाभ मिळतो. आदिवासी समाजबांधवासाठी शबरी आदिवासी आवास योजना राबविली जात असून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुदान दिले जाते. यातील काही योजनांना जिल्हा परिषद तर काही योजनांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजुरी दिली जाते.घरकुलांसाठी ग्रा.पं.ने पंचायत समिती मार्फत ग्रामीण विकास विभागाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पण तो होत नसल्याने शेकडो लाभार्थ्यांना झोपडीवजा घरात वर्षानुवर्षे वास्तव्य करावे लागत आहे. पंचायत समिती लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा यादीकडे दुर्लक्ष करीत आहे. लाभार्थ्यांनी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडे चौकशी केल्यास शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगत बोळवण करण्यात आल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. घरकुल मागणीची बहुतांश प्रकरणे शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली जात नसल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. गावखेड्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे, त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. परंतु या बाबीकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गावखेड्याच्या सौंदर्यात फारशी भर पडली नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गावखेड्यात सर्वांगीण विकासाला खीळ बसल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांद्वारे केला जात आहे.