शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जनजागृतीसाठी प्रशासनही आघाडीवर

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

लोकशाही बळकट करण्याकरिता संपूर्ण मतदारांनी मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावणे गरजेचे आहे; पण आजपर्यंत देशात कुठेही १०० टक्के मतदान झालेले नाही़ यामुळे निवडणुकीच्या निकालांवर मोठा

प्रशांत हेलोंडे - वर्धालोकशाही बळकट करण्याकरिता संपूर्ण मतदारांनी मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावणे गरजेचे आहे; पण आजपर्यंत देशात कुठेही १०० टक्के मतदान झालेले नाही़ यामुळे निवडणुकीच्या निकालांवर मोठा प्रभाव पडत असून असे मतदान कुण्या एका पक्षाच्या पत्थ्यावर पडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ यामुळे केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जनजागृती अभियान तसेच मतदार नोंदणी अभियान राबविण्याची सक्ती केली जाते़ असे असले तरी गत कित्येक वर्षांपासून मतदानाची टक्केवारी ९० च्या वर गेल्याचे ऐकीवात नाही़वर्धा विधानसभा मतदार संघात चार मतदार संघ असून सुमारे १० लाख ६ हजार २२ मतदार आहेत़ यात वर्धा विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ८१ हजार ६, आर्वीमध्ये २ लाख ४७ हजार ५६, देवळीमध्ये २ लाख ४६ हजार ८६३ तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ५९ हजार ५७८ मतदार आहेत़ यामुळे पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाणही जवळपास ९० टक्के आहे़ शिवाय ३० हजारांवर नवीन मतदारांची जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेली आहे़ सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोग आणि निवडणूक विभागाद्वारे कित्येक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न होत आहेत; पण या प्रयत्नांना अद्यापही यश आल्याचे दिसत नाही़ २००९ च्या निवडणुकीत जिल्हाभर जनजागृती कार्यक्रम राबविल्यानंतरही सरासरी ६५ टक्के मतदान झाले़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी गाठता आलेली नाही़ असे असले तरी या निवडणुकीनंतर सत्ताबदल अनुभवता आला़ मतदानाची टक्केवारी वाढली तर राजकारणात उलथापालथ होते, हे सर्वविदीत आहे; पण प्रयत्न करूनही १०० टक्के मतदान होत नसल्याचे सत्य नाकारता येत नाही़ लोकसभा २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली़ शिवाय जागोजागी पथनाट्यातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले़ घरोघरी बुथ लेव्हल आॅफीसरच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्या पोहोचवून मतदान करण्याचा आग्रह धरण्यात आला; पण त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही़ आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीही राज्य निवडणूक आयोग, निवडणूक विभाग व संपूर्ण प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदार जनजागृती अभियान सुरू केले आहे़ यात जागोजागी मोठे फलक लावण्यात आले असून मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह धरण्यात आला आहे़ वर्धा शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सामान्य रुग्णालय तसेच निवडणूक विभागाच्यावतीने ‘पोस्टर वॉर’च सुरू करण्यात आले आहे़ लोकसभा निवडणुकांपूर्वीही वर्धा शहरासह संपूर्ण लोकसभा मतदार संघात अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली होती़ या कार्यात राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्वच विभागांनाही जुंपण्यात आले होते; पण फार फरक पडला नव्हता़ आता किमान विधानसभा निवडणुकीत तरी १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत़ मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यशाळाही घेतली जात आहे़ शिवाय पोस्टर, सह्यांची मोहीम आदी अनेक माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत़ विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ मतदारांना जागृत करून मतदानाच्या टक्केवारीचे उद्दीष्ट गाठता यावे, यासाठी निवडणूक विभागासह प्रत्येक शासकीय कार्यालय प्रयत्न करीत आहे़ यासाठी शहरात जागोजागी लावलेले फलक जागृती युद्ध सुरू असल्याचा भास निर्माण करणारेच ठरत आहे़ याचा मतदारांवर किती परिणाम होतो, हे मात्र पाहण्याजोगे राहणार आहे़ चारही विधानसभा मतदार संघात अडीच लाखांवर मतदार असून १०० टक्के मतदान झाल्यास चित्र पालटण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात़ जनजागृती मोहिमेला यंदा किती यश येते, हे दि़ १५ नंतरच कळेल!