शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

चाऱ्यासाठी गोपालक, शेतकऱ्यांची भटकंती

By admin | Updated: April 20, 2016 02:23 IST

अपूरा पाऊस आणि काही पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ यामुळे गत काही वर्षांत चारा टंचाईने डोके वर काढले आहे.

दुधाचे भाव भिडणार गगणाला : ज्वारीच्या अल्प पेऱ्याचाही परिणामवर्धा : अपूरा पाऊस आणि काही पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ यामुळे गत काही वर्षांत चारा टंचाईने डोके वर काढले आहे. यावर्षी गुरांसाठी वैरण उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसह गोपालकांना वैरणासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुरांसाठी जिल्ह्यात चाराडेपो सुरू करावे, अशी मागणीही या अनुषंगाने समोर येत आहे.गुरांसाठी आवश्यक असलेले वैरण शोधूनही मिळत नसल्याने बाजारपेठेत मिळणारे पशुखाद्य विकत घेण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. हिरवे वैरण उपलब्ध नसल्याने दुधाच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊन दुग्धजन्य पदार्थाचे भाव वाढू लागले आहेत. परिसरातील अनेक पशुपालक शेतकरी वैरणाच्या शोधात भटकंती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांसह पक्ष्यांमुळे काहीही हाती येत नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढल्याचे दिसते. परिसरातील बारा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून या व्यवसायाची शेतकऱ्यांनी निवड केली. त्यावेळी गुरांना लागणारे वैरण मुबलक उपलब्ध होते. जंगलाचे प्रमाण अधिक होते. जंगली श्वापदांचे प्रमाण कमी होते. आता गुरांचे प्रमाण भरपूर असताना वैरणाचे प्रमाण नगण्य आहे. ज्वारीचा पेरा नगन्य असल्याने कडबा मिळत नाही. तूर, सोयाबीन व गहु या पिकांपासून मिळणारे वैरण निसर्गाच्या लहरीपणामुळे दुरापास्त झाले आहे. यावर्षी सोयाबीनची सवंगणी व मळणी न झाल्याने ते वैरणच उपयोगात आले नाही. गारपिटीमुळे गव्हाचे पीक हातून गेले. नगण्य प्रमाणात गव्हांडा हाती लागला. तुरीचे वैरणही हाती आले; पण प्रत्येक शेतकऱ्याला जनावरांची भुक भागविण्याकरिता आवश्यक असल्याने त्या वैरणाची विक्री केली जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसात गुरांना हिरवा चारा हवा असतो. यासाठी ऊसाच्या पाला उपयोगात आणला जात होता; पण आता ऊसाचेही क्षेत्र घटत असल्याने पाला मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी स्वत:च्या शेतात कड्याळू वा मक्याची पेरणी करतात. यासाठीही ओलिताची सोय गरजेची आहे. शिवाय रानडुकरही यावर ताव मारतात. यामुळे चारा मिळणेच कठीण झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)