शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सालकऱ्यांच्या शोधार्थ बळीराजाची भटकंती

By admin | Updated: March 20, 2015 01:44 IST

गुढीपाडवा तोंडावर आला आहे. या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालकऱ्याची नियुक्ती करतात.

विजय माहुरे घोराडगुढीपाडवा तोंडावर आला आहे. या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालकऱ्याची नियुक्ती करतात. यंदा मात्र गावातील सोडा जिल्ह्यातील सालकरी मिळणे कठीण झाले आहे. शेतात वर्षभर काम करण्याकरिता आवश्यक असलेल्या सालकऱ्याच्या शोधात शेतकरी जिल्ह्यात व परजिल्ह्यात फिरत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या नववर्षाला गुढी उभारून होत आहे. काही गावात होळी ते मांडवस या काळात वार्षिक मजुरी ठरवून सालकरी म्हणून ठेवण्याची प्रथा आहे, तर तालुक्यातील काही गावात गुढीपाडव्याला नवा सालकऱ्यांचे वार्षिक वेतन ठरवून कामावर शेतमजूर म्हणून रूजू करण्यात येते. सेलू तालुक्यात बागायती शेती असल्याने सालकरी म्हणून राहणाऱ्यांची संख्या कमी आहे. गत काही वर्षाअगोदर छत्तीसगड येथून बहुतांश परिवार रोजगार मिळविण्यासाठी येथे आले होते. ते काही वर्ष येथे राहून रोजमजुरी करायचे. सध्या ते त्यांच्या राज्यात परत गेले. नंतर गोंदिया, भंडारा व बालाघाट या भागातील काही परिवार या तालुक्यात रोजगाराकरिता आले. तेव्हा शेतावरील काम करण्यासाठी मजूर सहज मिळू लागले होते. आता मात्र चित्र बदलले आहे.गत पाच वर्षांच्या काळात मजुरांना सालकरी म्हणून मिळणाऱ्या वेतनापेक्षा विहिरीवरील कामावर, ट्रॅक्टरवरील कामात, तसेच नवनवीन बांधकामावर काम केल्यास अधिक मजुरी मिळू लागली. युवा मजुरी करणाऱ्यांचा कल शेतीकडून दूर झाला. तालुक्यात सुरू असलेल्या मनरेगामुळे मजुरांची शेतावरील कामाकरिता चणचण भासू लागली आहे. सुरू वर्षांत ७० ते ८० हजार रुपये वार्षिक मजुरी सालकऱ्यांची होती. यात कमी जास्त वेतन असले तरी महिन्याला ५ कुडव ८४० पायली गहू देण्याची प्रथा आहे.यावर्षी अस्मानी व सुलतानी संकटामुळे आर्थिकदृष्ट्या हवालदिल असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे सालकरी ठेवण्याचा प्रश्न कायम असला तरी शेती तर कसावीच लागणार. बैलजोडी ठेवावीच लागणार. सालकऱ्यांची नितांत आवश्यकता असल्याने आपल्या स्वखर्चात कपात करून नव्या सालकऱ्यांच्या शोधार्थ या तालुक्यातील सधन शेतकरी परजिल्ह्यात भटकंती करीत आहेत.